Thursday 14 March 2013

भोजनातील हानिकारक संयोग

                            भोजनातील हानिकारक संयोग 



दुधा सोबत

दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत.

दह्या सोबत

खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.
 

तुपा सोबत

थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.

मधा सोबत

मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.

फणसा नंतर

पान खाणे हानिकारक असते.

मुळ्या सोबत

गुळ खाणे नुकसान दायक असते.

खीरी सोबत

खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.

गरम पाण्याबरोबर

मध घेऊ नये

थंड पाण्याबरोबर

शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये.

कलिंगडा बरोबर

पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.

चहा सोबत

काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.

माशा सोबत

दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.

मांसा बरोबर

मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.

गरम जेवणा बरोबर

थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.

खरबुजा बरोबर

लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दहि नुकसान कारक असते.

तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. ऍल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पाताळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.



Read Udan Stori ( Please Add Skeep ) .....

शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र

                        शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र       



  • सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे.
  • मलमूत्र, शिंकम अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायु व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना रोकु नये.
  • कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्या करिता चांगले. भूकेपेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठिक राहते.
  • धैर्याने काम केल्यास बुद्धि ठिक राहते. पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो.
  • अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवतांना काळजी करणे, जेवतांना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी पाल्याने अपचन व अजीर्ण होते.
  • भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणे व भुके पेक्षा अधिक जेवणे प्रकृतिला चांगलेनसते. बघितल्या शिवाय पाणी पिऊ नये. जाणल्या शिवाय मित्रता करू नये, हात धुतल्या शिवाय जाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्याचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शुत्रता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधि आणि विपत्ति पासून बचाव होऊ शकतो.
  • अतिव्यायाम, आति थट्टा विनोद, आति बोलणे, आति परिश्रम, आति जागरण, आति मैथुन, ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरी आति कारणे योग्य नाही, कारण अति करणे आज ना उद्या कष्ट कारकच ठरते.
  • या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रितीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रितीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचे ही विष होऊ शकते. हिवाळ्यात सकाळी उन घेणे व रात्री थंदी पासून बचाव करणे हितकारी असते. परंतू उपाशी राहणे व उशीरा पर्यंत जागणे नुकसानकारक असते.
  • झोपवयास जाण्या अगोदर लघवी करणे, गोड दुध पिणे, दात घासून चुळ भारणे, हात पाय धुणे, दिवसाभर केलेल्या कामावर मनन करून ईश्वराचे ध्यान करत झोपणे. मानसिक आणि शारिरिक स्वास्थासाठी हितकार असते. जेवताना आणि झोपतना मन एकाग्र असते. जेवताना सॅलेड म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, पालक इत्यादी जे काही उपलब्ध असेल ते बारीक सॅलेड करून  

Read भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय...

कुशाग्र बुध्दी साठी

                                      कुशाग्र बुध्दी साठी  



Dr. Santosh Jalukar Phone: 9969106404
santoshjalukar AT rediffmail.com

‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पाहात असतात. बौध्दिक विकासासाठी किंवा स्मरणशक्ती वाढविण्या साठी आज बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत व दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. त्यापैकी नेमकी कोणती औषधे घ्यावी किंवा कोणते उपचार करावे हे कळेनासे होते. आपले उत्पादन कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची तर जणु चढाओढच लागलेली असते. अशा वेळी कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये हे कळेनासे होणे स्वाभाविक आहे. अशा उत्पादनां पैकी काय घ्यावे, किती प्रमाणात घ्यावे ह्या औषधांशिवाय आणखी काय उपाय आहेत, आहार काय असावा, व्यायामाचे महत्व काय, देवपूजा किंवा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे, ज्ञान ग्रहण करण्याचे कार्य नेमके कसे होते, ग्रहण केलेले ज्ञान कशा प्रकारे साठवले जाते, ते आठवण्याची क्रिया नेमकी कशी होते, ह्या व अशा प्रकारच्या अनेक शंका आपल्या मनाला रोज भेडसावत असतील. ह्या सर्व शंकांचे समाधान शास्त्रीय दृष्टिकोनातून बघूया.

तीन स्टेप प्रोग्रॅम:

ज्ञान ग्रहण करण्यासाठी शरीर पाच ज्ञानेंद्रियांचा प्रामुख्याने उपयोग करते. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक अशा पाच इंद्रियांना पंचज्ञानेंद्रिय म्हणतात. ह्या इंद्रियांमुळे मेंदू पर्यंत ज्ञान संवेदना पोचविण्याचे कार्य शरीर सहज करू शकते. हे काम योग्य प्रकारे होण्यासाठी ही पाचही इंद्रिये स्वच्छ, तंदुरुस्त व त्यांच्या माध्यमाने संवेदना वहन करण्यासाठी असलेल्या नाड्या (Nerves) योग्य प्रकारे स्निग्धता युक्त (properly lubricated) असणे आवश्यक आहे. सर्दी झाली की वास येत नाही हे अगदी नेहमीच्या बघण्यातले उदाहरण. म्हणजे त्या इंद्रियामधे निर्माण झालेल्या दोषामुळे वासाची संवेदना मेंदूपर्यंत जात नाही. स्निग्धता इंद्रियांना किती आवश्यक आहे हे समजण्या साठी एक वाक्प्रचार आपण लहान पणा पासून ऐकत आलो आहोत, “डोळ्यात तेल घलून पहा, किंवा डोळ्यात तेल घलून लक्ष दे” म्हणजेच ज्ञानेंद्रियांची शक्ती किंवा कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी तेल किंवा तुपा सारखा स्निग्ध पदार्थ किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. आयुर्वेदात तुपाच्या गुणधर्मां विषयी फार सुंदर वर्णन केले आहे, ते असे:
“शस्तं धी स्मृति मेधाऽग्नि बलायुः शुक्र चक्षुषाम्….” म्हणजेच बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू वर कार्य करणारी औषधे नाकाच्या मार्गे दिली तर त्यांचा परिणाम लवकर होतो. कारण ब्लड-ब्रेन बॅरियर यंत्रणे पासून मुक्त अशा सोप्या मार्गाने ही औषधे काम करतात. अलिकडे मधुमेहा साठी नाकाच्या मर्गे इन्सुलिन देण्याचे नवीन तंत्र प्रचलित होत आहे. ह्याच तत्वावर आधारित उपचार पध्दती आयुर्वेदात नस्य विधी म्हणून वर्णन सापडते. नाकाच्या मर्गाने टाकलेले औषध रक्तात शोषले जाण्यासाठी फक्त १.५ मिनिटांचा अवधी पुरेसा होतो असे प्रयोगांती सिध्द झाले आहे. केशर, जेष्टमध, अश्वगंधा सारख्या वनस्पतींचा अर्क गायीच्या तुपामध्ये सिध्द करून हे तूप नियमितपणे नाकात चार चार थेंब टाकावे. त्यामुळे नाका बरोबरच कान व डोळ्यांची पण शक्ती सुधारते, डोळ्याने वाचलेला व कानाने ऐकलेला विषय किंवा अभ्यास सहज पणे मेंदू पर्यंत विना-अडथळा पोचतो. बोटात अंगठी जात नसेल तर त्या ठिकाणी तेल किंवा दुसरा काही स्निग्ध पदार्थ लावला की ती क्रिया अगदी सहज होते. ह्या उपचारा मुळे काही त्रास न होता नकळतपणे अनेक फायदे होऊ लागतात. कोणाला वरच्या वर सर्दी होत असेल तर तो त्रास नाहिसा होतो, केस गळत असतील तर थांबून जातात, वाचून वाचून डोळ्यांना थकवा वाटत असेल तो थकवा गायब होतो, डोळ्यांची आग थांबते, कानात दडे बसत नाही, चष्म्याचा नंबर हळू हळू कमी होत जातो व कायम साठी जऊ पण शकतो, डोकेदुखीचा त्रास असल्यास तो पण आपोआपच ठीक होतो. हे नस्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर करणे योग्य आहे. ह्या वेळी केल्याने अधिक फायदा होतो. नाकात थेंब टाकल्या नंतर ५ मिनिटे आडवे पडून राहावे. कधी कधी हे औषधी तूप घशात उतरल्या सारखे जाणवते. त्यावर घोटभर कोमट पाणी प्यावे. मेंदूची अभ्यास ग्रहण करण्याची क्षमता म्हणजेच आकलन शक्ती चोख राहते व त्या मधे काही अडथळा न येता विषयांचे आकलन सहज होते.
दुसरी पायरी: ज्ञान योग्य प्रकारे साठवण्या करिता आवश्यक अशी रचना मेंदूच्या पेशींमध्ये घडवून आणण्याचे कार्य ह्या मुळे होते. ब्राह्मी, शंखपुष्पी, शतावरी, अश्वगंधा सारख्या वनस्पतींमुळे मेंदूच्या पेशींमधील प्रथिनांचे संहनन सुधारते असे शास्त्रीय प्रयोगां मधे आढळून आले आहे. वाचनालयात नवीन पुस्तकांची भर पडली तर कपाटांची संख्या वाढवावी लागते त्याच प्रमाणे अभ्यास वाढू लागला की मेंदूच्या क्षमते मधे वाढ करावी लागते. सध्या बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक सर्व औषधे ह्याच प्रकारे कार्य करतात. ह्या औषधांचा उपयोग होण्याची सुरुवात साधारणतः १५ दिवसांत होते. हा फरक थर्मोमीटर ने ताप मोजण्या इतका सहज मोजता येत नही हे खरे पण मेंदूच्या क्षमते मधे वाढ कशी होते हे देश-विदेशी झालेल्या असंख्य प्रयोगांमधे निर्विवाद पणे सिद्ध झाले आहे. शिवाय दीर्घकाळ पोटात घेऊन काही दुष्परिणाम होत नाही असे अभ्यासकांचे ठाम मत आहे. ह्या वनस्पतींचे इतर अनेक गुण आहेत. रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण सुधारते, रोग-प्रतिकार शक्ती सुधारते, स्नायूंचे बळ वाढते, कॅल्शियमची झीज भरून निघते, स्टॅमिना वाढतो, जखमा लवकर भरून निघतात, केसांमधील मेलॅनिन वाढते त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची शक्यता कमी होते. बाजारात उपलब्ध असलेले उत्पादन घेतांना मात्र त्यामधील घटकांचे प्रमाण योग्य आहे ह्याची खात्री करणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात घटक असण्यामुळे अपेक्षित गुण ठराविक कालावधी मधे मिळू शकत नाही. मुलांसाठी उत्पादन घेतांना चवीचा विचार करणे आवश्यक आहे. ह्या सर्व वनस्पती चांगल्याच कडू असतात त्यामुळे मुले नियमित पणे घेतील की नाही? नियमित पणे घेण्यासठी आवडीची चव आणि स्वाद असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तोंड वाकडे करीत कसेतरी घशाखाली ढकललेल्या औषधाचा उपयोग जेमतेमच होईल. मुलाने आपणहून मागणी करावी अशा छान छान चवींची उत्पादने आता सहज मिळू लागली आहेत.
सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी: केलेला अभ्यास बरोबर योग्य वेळी आठवणे ह्याला स्मरणशक्ती म्हणतात. स्मरणशक्तीची यंत्रणा मेंदूच्या विशिष्ट भागातून नियंत्रित केली जाते. त्याला योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नाकाच्याच मार्गाचा उपयोग होतो. फीट आल्यावर कांदा फोडून नाकाजवऴ धरतात व त्याच्या उग्र वासाने बेशुध्द अवस्थेतून झटकन शुध्द येते. विशिष्ट वास घ्राणेंद्रिया द्वारे घेण्यामुळे मेंदूतील स्मरणयंत्रणा कार्यरत होते. ह्या विषयी जर्मनी मधे काही संशोधकांनी प्रयोग केले. विद्यार्थ्यांच्या एका समूहाला एक चाचणी प्रश्नसंच देऊन एका खोलीत झोपण्याची व्यवस्था केली. झोपेत असतांना त्या खोलीत विशिष्ट सुगंधाची रात्री ४/५ वेळा फवारणी केली. त्या त्या वेळी मेंदूचा एफ् एम् आर् आय् (fMRI) स्कॅन घेतला. तेव्हां मेंदूतील हिपोकॅम्पस ची क्रिया अधिकच गतिमान होते असे लक्षात आले. दुसरा दिवस उजाडल्या नंतर त्यांची परीक्षा घेतली त्यावेळी त्यांना ९७ % उत्तरे अचूक सांगता आली. ज्या खोलीत अशी फवारणी केली नव्हती त्यांची फक्त ८४ % उत्तरे अचूक आली. ह्या वरून आपल्याला लक्षात येते की विशिष्ट वासामुळे मेंदूतील स्मरण शक्ती अधिक कार्यरत होते. ह्या संशोधनावर आधारित वेखंड, जटामांसी, वाळा इ. सुगंधी वनस्पतीं पासून एक औषधी अगरबत्ती तयार केली. अभ्यास करतांना व रात्री झोपतांना खोलीत ही अगरबत्ती लावावी. हा उपाय करण्याने अभ्यास केलेला विषय मेंदूतील स्मरणयंत्रणेमध्ये पक्का बसतो व योग्य वेळी आठवण करून देण्यासाठी मदत करतो.
देवाची भक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार: देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे हे समजणे आपल्याला नक्कीच आवडेल. कॉर्टिझॉल नामक एक द्रव-पदार्थ (हॉर्मोन) भीती मुळे शरीरात निर्माण होतो आणि जेवढा अधिक कॉर्टिझॉल निर्माण होईल तेवढा तो मेंदूच्या पेशींना मारक किंवा घातक असतो हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिध्द झाले आहे. लहान मुलाला उंच फेकल्यावर तो हसतो कारण त्याला खात्री असते की आपल्याला वरती फेकणारा जो कोण आहे तो आपल्याला खाली पडू देणार नाही, आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही. देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळे नकळतणे मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो ज्याने कोणत्याही संकट किंवा अडचणीच्या वेळी निर्माण होणारी भीती व त्याचा परिणाम म्हणून कॉर्टिझॉलचा आघात कमी होतो. अर्थात, मेंदूवर होणारा विपरीत परिणाम ह्या प्रकारे सहज टाळता येतो. घरातून बाहेर प्रवासाला जातांना देवाला आणि वडील माणसांना नमस्कार करण्यामागे हाच उद्देश होता. पूर्वी चांगले रस्ते, सुरक्षित वाहाने नव्हती. प्रवासासाठी बैलगाडी किंवा घोडे वपरले जात. शिवाय पाऊस, वादळ, खान-पान, जंगलातील प्राणी अशा अनेक संकटांचा सामना करण्याचे धैर्य फक्त देवभक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळेच मिळू शकते. संकट प्रसंगी तातडीचा नेमका आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता ह्या एकाच गोष्टीमुळे शक्य होते.
नियमित व्यायामाचे महत्त्व: कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वत:च्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशीर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पीळदार दिसते खरे, पण अशा पीळदार शरीरयष्टी वाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोळामासाच असते, त्यांची बौध्दिक क्षमता बेताची असते, लहानशा अपघातने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांस धातूच्या पोषणासाठी वापरले जातात, परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते. थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानां पेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात.
बुध्दीचा व्यायाम: नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुद्रुढ आणि बलवान होतात तसेच बुध्दीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवाची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुध्दीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजे. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे कधीही न विसरण्या इतका पक्का होतो. अभ्यास शब्दाचा खरा अर्थ आहे ‘तीच तीच गोष्ट वारंवार करणे’.
आहारा बद्दल थोडेसे: मनुष्य शरीराची रचना घडवतांना निर्मात्याने फक्त शाकाहाराच्या पचनासाठी योग्य अशी यंत्रणा घडवली आहे. त्यामुळे ज्यांना मांसाहाराची आवड असेल त्यांनी आठवड्यातून एक वेळा पेक्षा जास्त मांसाहार करू नये. आयुर्वेदात पंचखाद्य नावाचा एक चविष्ट पदार्थ वर्णन केला आहे. खारीक, खजूर, खोबरं, खसखस आणि खडीसाखर अशा ‘ख’ ने सुरुवात असलेल्या पाच गोष्टी एकत्र करून झकास चवीचा हा पदार्थ मधल्या-सुटी साठी फार आवडीचा मेनू होऊ शकतो. हा नुसता ‘सुका-मेवा’ नव्हे तर खरोखर ‘बौध्दिक-मेवाच’ आहे.
ह्या उपायांना प्रयोगात्मक समजू नये. शास्त्रीय पध्दतीने प्रयोग करून अनेकांनी आपले अभिप्राय (testimonials) दिले आहेत. 


Read Love Stori ( Please Add Skeep ) .......... 

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स

         वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स 



Dr. Santosh Jalukar Phone: 9969106404
santoshjalukar AT rediffmail.com

आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.

१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.

२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.

३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.

४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.

५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.

६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.

७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.

८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.

९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.

१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.

११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.

१२) जस्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.

१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.

१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.

१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.

१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.

१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.  


Read devotional ( Please Add Skeep ) ....................

मौखिक आरोग्य

                             *  मौखिक आरोग्य  * 



- डॉ. संजीव कांबळे

आपल्या मौखिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासावे. दात स्वच्छ करण्यासाठी कोळसा, मिश्री यांचा वापर करू नये.
आहार हा संतुलित असावा. आहारात हिरव्या पालेभाज्या व गाजर, मुळा, काकडी यांचा समावेश असावा. शक्यतो गोड पदार्थ तसेच लहान मुलांना; चॉकलेट-गोळ्या देण्याचे टाळावे. दात किडल्यास त्यात अन्न अडकण्यास सुरुवात होते व दात दूखू लागतात. त्वरीत उपचार करावे व दंततज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सतत सुपारी, तंबाखू पानमसाला, गुटखा खाणे म्हणजे कॅन्सरला निमंत्रण होय; सतत सुपारी चघळण्यामुळे तोंडाच्या आत पांढरे व्रण उमटतात. दातांच्या एनॅमलवर परिणाम होऊन दात पिवळे पडातात व हिरड्या खराब होतात. सुपारी, तंबाखू, गुटख्यामध्ये असलेले टॉनेन, नायट्रोझामाईन कर्करोगजन्य पदार्थ निर्माण करतात. जास्त साखर व साखरेचे पदार्थही दंतक्षय निर्माण करतात.
नियमित तपासणी, वेळीच उपाय आणि नियमित दातांची निगा यामुळे मौखिक आरोग्य आपण जपू शकू.


Read Joke ( Please Add Skeep )................

लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय

                           लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय 




- डॉ. संजीव कांबळे

तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ केरात, असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे.
तसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते.
काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही जागरुक असले पाहिजे. परंतु पाणी जास्त पिले पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान ८-१० ग्लास पाणी पिले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.
एकटी राहणारी व्यक्ती फ्रीजमध्ये कमी कॅलरी असलेली पदार्थ साठवू शकतात. परंतु कुटुंबासमावेत राहण्यासाठी हे शक्य होत नाही. तेव्हा डायटींग करणे कठीण होते. तेव्हा मनोनिर्धार कामी येतो. काही झाले तरी कमी खायचे हा परिपाठ पाळायचाच. आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत करावे. वजन कमी करतांना आपल्या मित्रांशी स्पर्धा करा. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास अपेक्षाकृत वजन कमी झाल्याचे लक्षात होईल. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करु घ्या.

Read Samaj Stori ( Please Add Skeep ) .............

वाढती सांधेदुखी : पथ्याने व्हा सुखी

                           वाढती सांधेदुखी : पथ्याने व्हा सुखी 



- डॉ. उदय के. नेरलकर

संधीवाताच्या रोगावर पथ्यापथ्य, चिकित्सेने होणार परिणाम हा रोग्यांची सांधेदुखी कमी होण्यास अधिकच मदत होईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत.
काही सांधेदुखीचे रोगी हेज्यांनी आहारात अवेळी जेवण करणे. अल्प जेवण करणे, शिळे, रूक्ष अन्न खाणे, अवेली भोजनात जड अन्न खाणे, अत्याधिक मैथुन करणे तसेच आहारात तेल, तुपाचे प्रमान कमी असणे, विशेषतः गरीब वर्गात तेल, तुप इत्यादी प्रमाण कमी असून अत्याधिक कष्टाची, मेहनतीची कामे करावी लागतात. तसेच वाढते वय, त्यामुळे शरीरात होणारी धातूंची झीज, बलहानी, पोषणाचा, पोषकतत्त्वाचा अभाव हा गरीब वर्गात आढळतो. तसेच काही लोकांचे अत्याधिक फिरणे, धार्मिक भावात अतिउपवास करणे, मानसिक चिंता, शोक तसेच एखाद्या आजाराच्या परिणामी येणारी दुर्बलता इत्यादी कारणांमुळे सांधेदुखीही आढळते. अशा रोग्यास त्याचे पथ्य म्हणजे आहार आणि विहारातील बदल हाच होय. जसे त्यांच्या आहारात तेल, तूप इत्यादी स्निग्ध पदार्थ घेणे, धातूंना पोषक व बृहन करणारा असा मांसरस, दूध, तूप, तेल इत्यादी आहारात घेणे. तसेच विहारात कष्टाची कामे कमी करणे, योग्य असा आराम घेऊन ती करणे. इत्यादीमुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होईल. सध्या मध्यम व उच्च वर्गातील रूग्णांमध्ये वाढती सांधेदुखी घेऊन येणारे रूग्ण अतिप्रमाणात येत आहेत. त्यावरून त्यांचे निदान आम्ही करत असतांना ते बहुधा संधिवाताच्या आमवात, वातरक्त इत्यादी गंभीर प्रकारातील आढळतात.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य जनतेत कामाच्या व्यापाने व इतर कारणाने अवेळी भोजनम, विरूद्ध आहार, भूक लागली नसतांना पण जेवणे. तेल तुपाचे पदार्थ, अति स्निग्ध, जड असे भोजन करणे व लगेचच फिरणे, तसेच सदा काही ना काही खात राहाणे. नुसते पडून वा बसून राहणे. थंड कुलरसमोर वा वातानुकुलीन रूममध्ये जास्त काळ राहणे. रोज दिवसा झोपणे, लठ्ठ होण्याच्या इच्छेपोटी अति स्निग्ध पदार्थ जसे तूप, बदाम, काजू, शेंगदाणे, दूध व त्याची विकृती, बासुंदी, दही, श्रीखंड आदी खाणे. आईसक्रीम खाणे, फ्रीजचे अतिथंड पाणी सतत पिणे, रात्री कामास कंटाळून रोज भात, खिचडी खाणे अशा आहार व विहाराने दुषित अशा (विकृत आहार रस भाव) आमाची, धातूची मेदाची वृद्धी होते. त्यामुळे परिणामी लठ्ठपणा (मेदवृद्धी), आमवात (सांधेदुखी)आदि आजारांचे पाहुणे शरीरात येतात. तेव्हा अशा सांधेदुखीच्या रूगणांना त्यांचे पथ्य म्हणजे त्यांनी भूक लागल्याशिवाय जेवू नये. आहारात स्निग्ध पदार्थ, तांदळासारखे पदार्थ, दूध व त्यांची विकृती, तसेच जड अन्न इ. खाणे टाळावे. तसेच फ्रीजचे अतिथंड पाणी पिणे, थंड पेय इ. टाळावे. कोष्ण पाणी पिणे, दिवसा शरीरास शक्यतोवर सतत व्यायामात राहील असे शरीर हालचालीत ठेवणे. यातच प्रात फिरणे, घरची कामे करणे इ. पथ्यांनी वरील रोग्यास बराच फायदा होईल. तसेच सांधेदुखीत सांधे हालचालीत राहिल्याने पुढील उपद्रव होणे टळतील.
सांधेदुखीचे पथ्यापथ्य सांगताना सध्याच्या बदलत्या हवामानाचा (कालाचा) विचार पण एक प्रमुख मार्गदर्शक ठरतो. तेव्हा उन्हाळ्यात उन न पडणे, पाऊस पडणे तसेच हिवाळ्यात पाऊस पडणे वा पावसाळ्यात उन पडणे या बदलत्या वातावरणाचा शरीरावर तसेच सांधेदुखीवर प्रभाव हा पडतो. पण कालाचा परिणम टाळाणे हे अपरिहार्य आहे. त्यावर तोडगा म्हणजे आयुर्वेदातील व्यापक असा पंचकर्म उपचार, स्वस्थ वृत्त, व ऋतकालीन दिनचर्या इ. होय. तसेच काही रूग्णांत आढळणारे सांधेदुखीचे आगळे वेगळे स्वरूप म्हणजे सांध्यात ठणका असणे, दिवसा व रात्री झोप न लागणे, छोटे सांधे दुखणे, अतिशय वेदना, स्पर्श सहत्व, सार्वदेहीक दाह, दांर्बल्य पांडुता असणे, भूक न लागणे इत्यादी लक्षणे, जी श्रीमंत व सामान्य वर्गात पण आढळतात, त्यांची कारणमीमांसा लावली असता ती म्हणजे दूषित रक्ताची (वात रक्तांची) सांधेदुखी लक्षणे होत. अशा रोग्यात त्यांचा आहार विहार, आमवातातील रोग्याच्या साजेचा पण रक्ताला विदग्ध करणारा असा घडलेला असतो. असे रूग्णात मंदाग्नी असतांना जेवणे, अजीर्ण झाले तरी खाणे तसेच सांध्याची आंबलेली खारट, आंबट, गोड असे पदार्थ खाणे, त्यातच चाट भांडावरील पदार्थ अधिक सातत्याने खाणे, दही सतत खाणे, थंड पेये, फळांचा रस थंड असा पिणे, मांसाहार इ. खाणे, अति चहा पिणे, अति मद्यपान करणे, धुम्रपान करणे, रात्री जागरण करणे, अति फिरणे, तसेच उष्ण शीतकाल व्यतासात येणे इ. आहार व विहार वात व रक्त अशा दोन्ही गोष्टीस प्रकुपित व दुषित करतो. असे दुष्ट रक्त व वात संधिस्थानात , शोच, ठणका आदी पूर्वरूपात्मक लक्षणे उत्पन्न करतात. अशा रोग्यात त्यांनी आपला आहार विहार बदलला पाहिजे. व प्रामुख्याने वरील सातत्याने घडणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या सांधेदुखीचे निराकरण व उपचार हा पथ्याने साधता येईल. अशा प्रकारे सांधेदुखीच्या आजारावर व इतर अनेक आजारांवर आपल्याच आहार विहारातून प्रारंभी पथ्यापथ्यानेव आयुर्वेदातील इतर व्यापक उपचाराने विजय मिळविणे सहज शक्य होईल.

हृदयरोग झाल्यासारखे वाटतं

                             हृदयरोग झाल्यासारखे वाटतं 




- डॉ. एम्‌. एम्‌ हिरेमठ

हृदयाची धडधड वाढली की वाटतं हृदयरोग झाला. हृदयरोग झाला हे ओळखायचं कसं?
असा एक नेहमी विनोद सांगतात,एका माणसाला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या मित्राने त्याला एका त्वरीत एका चांगल्या रूग्णालयात हलविले. डॉक्टरांनी प्रयत्नाची शिकस्त केली. अनेक तपासण्या व औषधोपचार केले. तो माणूस बरा झाला. त्याच्या हातात रूग्णालयाचे बिल पडले आणि त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

यासारख्या घटना अनेक प्रश्न निर्माण करून जातात. हृदयविकारात आधुनिक तपासण्यांची खरोखरच गरज असते का? हृदयविकाराचे निदान आणि त्याच्या कारणांचे निदान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. छातीची पट्टी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफने हृदयविकाराचे निदान होऊ शकते. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे हृदयाच्या कार्यासाठी लागणाऱ्या विद्युत प्रणालीचा कागदावरील आलेख. जेव्हा हृदय नीट काम करीत नाही. तेव्हा आलेखात काही निश्चित बदल होतात, ज्यायोगे हृदयविकाराचं, हृदयविकाराच्या झटक्यांचं निदान होऊ शकतं. हृदय विकाराचे कारण हृदयाच्या धमणीचं आकुंचन किंवा धमणी बंद होणे हे असते. जे ईसीजीने कळू शकत नाही तसेच हृदय विकाराबरोबर हृदयाच्या झडपांचा आजार तसेच हृदयाचा वाढलेला आकार हे निश्चित समजू शकत नाही. यासाठी छातीचा फोटो (एक्स-रे) काढला जातो. थोडक्यात काय तर ई.सी.जी. व छातीच्या एक्सरेने हृदयाच्या आजारच प्राथमिक निदान करता येते.
हृदयाच्या धमन्यांचं आकुंचन वा बंद होणे ऍथॅरोस्केलरॉसीस हा रक्तातील चरबीचे वाढलेले प्रमाण व काही वेळेस रक्तातील गुठळ्यामुळे होऊ शकते. यापैकी कोणत्याही कारणाने नक्की धमणी बंद पडली हे समजण्यासाठी रक्त्याच्या तपासण्या कराव्या लागतात.




Read Children Stori ( Please Add Skeep ) ................... 



अंजायनाच्या (छातीत विशिष्ट प्रकारची चमक येणे) ही हृदय विकार झटक्याची पूर्वीची पायरी असते आणि या वेळेस योग्य उपचाराने पुढील संकट टळू शकते. त्यासाठी हृदय धमणी कुठे बंद व किती आकुंचन पावली आहे, हे शोधून त्या धमणीतील रक्ताचा मार्ग मोकळा करणे, किंवा वळविणे (बायपास) हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार असतो. त्यासाठी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख धमन्यापैकी किंवा त्याच्या शाखांपैकी कोठे दोष आहे हे शोधण्यासाठी पायाच्या शिरेतून एक अति सूक्ष्म नळी हृदयापर्यंत नेऊन एक रंगद्रव (OYE) हृदयाच्या धमणीत सोडला जातो. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे अनेक एक्स रे काढले जातात. एक्स रे वर ते रंगद्रव कुठे पसरले आहे व कुठे अडकले हे कळू शकते. त्यावरून कोणती धमणी कुठे बंद पडली अगर आकुंचित झाली ते कळते.
अजायनाच्या निदानासाठी रूग्णाला वैद्यकिय सुविधांनी सुसज्ज रूग्णालयात एक विशिष्ट व्यायाम करायला लावून त्याचा सलग ई.सी.जी. काढला जातो. वाढत गेलेल्या व्यायामाबरोबर ज्या क्षणी ई.सी.जी. मध्ये हृदय विकाराची पूर्व लक्षणे दिसू लागतात. त्याक्षणी व्यायाम थांबविला जातो. याला स्ट्रेट-ट्रेस्ट म्हणतात. एखादी व्यक्ती हृदय विकाराला बळी पडू शकेल की नाही हे या पद्धतीने ठरविता येते.

काही वेळा हृदयाच्या गतीच्या अनियमितपणामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. यासाठी २४ तास हृदयाचा ई.सी.जी. काढावा लागतो. याच पद्धतीला डॉक्टर ‘मॉनेटरींग’ असे म्हणतात.
यापुढील तपासण्या अत्याधुनिक प्रकारच्या अशा आहेत. त्यात प्रथम येते ती टू-डी-एकोकार्डिओग्राफी ध्वनीलहरींचा वापर करून त्याची प्रतिमा संगणकाद्वारे उमटविली जाते. यामध्ये हृदयातील झडपा, हृदयाची स्थिती, जवनिका, कर्णिका या विषयी माहिती मिळू शकते.
यापेक्षा आधुनिक म्हणजे कलर डॉप्लर यामध्ये टू-डी-एकोकर्डिओग्राफी मध्ये समजणारी सगळी माहिती मिळतेच, परंतु ऑक्सीजन न मिळणारा भाग व पुरेसा ऑक्सीजन मिळणारे हृदयाचे स्थायू हे वेगवेगळ्या रंगात दिसतात. हृदय किती प्रमाणात खराब झाले आहे, याचा अंदाज यावरून घेता येतो.
विज्ञानाची प्रगती जसजशी होत आहे. तसतशी परिक्षण (डायग्रोस्ट्रोक्स) करण्यामध्येही क्रांती होत आहे. संगणकाचा आधार घेऊन हे तंत्रज्ञान निकसित होत आहे. आपण प्रवासात असतांना देखील विशिष्ट उपकरण लावल्यावर शेकडो कि.मी. अंतरावर असलेल्या आपल्या डॉक्टरांना ई.सी.जी. कळू शकतो व त्यावरून तो औषधे सुचवू शकतो. अशीच क्रांती या क्षेत्रात होत राहील. हे परिक्षण करून घेतल्यावर आपल्याला हृदयाची निश्चित विकृती कळते व त्यावरून काही शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो.

त्या दृष्टीने तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु सध्या तरी या तपासण्या सर्वसामान्य लोकांसाठी महागड्याच आहेत. त्याही या आधुनिक प्रकारातल्या तपासण्या मोठ्या शहरातील ठराविक रूग्णालयातच उपलब्ध आहेत. त्यामुळे सामान्य माणसासाठी त्या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.


Read Marathi News ( Please Add Skeep ) ...................

निपुत्रिका पुत्रवती कशी होईल?

                            निपुत्रिका पुत्रवती कशी होईल? 



डॉ. अरविंद संगमनेरकर

M.D.,D.G.O. स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ

हल्लीच्या मुलामुलींच्या खेळण्यात कितीतरी नवीन नवीन खेळण्यांची भर पडत असते. लाकडी खेळण्यांची जागा प्लॅस्टिकच्या खेळण्यांनी घेतली. दोरी बांधून ओढायचा हत्ती, घोडे याची जागा रिमोट कंट्रोलच्या मोटारी, आगगाड्या रणगाड्यांनी घेतली. पण प्रत्येक मुलाच्या खेळण्यात एकतरी बाहुली असतेच असते. पूर्वी ठकी होती, आता प्लॅस्टिकची, डोळ्याची उघडझाप करणारी एवढाच फरक. पण खेळण्यात बाहुली असतेच असते. मुली तिला मांडीवर घेतात. झोपवतात, गाण म्हणतात. खाऊ घालतात, वेळप्रसंगी चापटपोळीही देतात!
खेळण्यातली बाहुली ही स्त्रीच्या उत्कट इच्छेचं असतं. मुलीच्या खेळण्यातली भातुकली हा तिच्या भविष्यातल्या स्वप्नांचा लुटुपुटीचा संसार असतो.


Being Mother
मुलगी मोठी होते. शिकते, संस्कारित होते आणि मग एक दिवस लग्न होऊन संसार करू लागते. भातुकलीच्या खेळामधला राजा-राणींचा संसार खऱ्या अर्थानं सुरू होतो. आता दुसरं स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ केव्हा येते याची वाट ती पाहते-मनातली बाहुली खेळातली ठकी वास्तवात केव्हा येईल? बाळाला कुशीत घेऊन थोपटू, त्याला पाजू, खेळवू, मोठं करू.....
एकदोन, अडीच तीन. वर्षांमागून वर्षे जातात. पण कूस उजवतच नाही. मग राजाराणीच्या संसारात धुसफूस, चिडाचीड सुरू होते. सासू-नणंदाची कुजबूज. आईचा दुःखीकष्टी चेहरा, मैत्रिणी नातेवाईकाची दृष्टी सगळे तिच्या अंगावर येऊ लागत. कोणी सुचवतं तपासून ये. माहेरचे म्हणतात तपासायला दोघंही जा. कोणात दोष आहे?... घरात सुरू होते. पती तयार होत नाही. ‘तुझ्यातच दोष आहे. वंशाचा दिवा लागणार नाही ’ अशी विषारी वाक्य झेलत तिला दिवस काढावे लागतात. जिणं नको वाटू लागते.
पण अशावेळी तिने निराश व्हायचं अजिबात कारण नाही. मूल होत नाही म्हणून नशिबाला बोल लावायचे नाहीत. अंगरिधुपारे करायचे नाहीत. मन शांत ठेवायचं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा.
हल्ली विज्ञान इतकं पुढं गेलं आहे की, निपुत्रिका पुत्रवती होऊ शकते. त्यासाठी कितीतरी वर्ष शास्त्रज्ञ झटत होते. अजूनी झटत आहेत. तेव्हा निराश का व्हायचं?

हे नवेनवे शोध आणि उपचारपद्धती विविध तऱ्हेच्या असतात. त्यांची माहिती असणं केव्हाही चांगलेच ठरतं. मूल न होणे हे काही त्या स्त्रीच्या चुकीमुळे झालेले नसतं. तेव्हा अशा स्त्रीला दोष देणं सर्वस्वी अयोग्यच उलट तिला बाकीच्यांनी, विशेषतः तिच्या पतीनं धीर द्यायला हवा दोघांनीही डॉक्टरांकडे जायला हवं आणि या उपचाराची माहिती करून घ्यायला हवी.
सर्वसाधारणपणे १० ते १५ टक्के स्त्रिया तीन वर्षांनंतरच्या वैवाहिक सुखानंतरही मातॄत्वाचं सुख अनुभवू शकत नाहीत. लग्नानंतर तीन वर्षांत जर दिवस गेले नाहीत तर त्याला सामान्यपणे वंध्यत्व म्हणतात. 


Read Udan ( Please Skeep Add ) ........................


तपासणी केव्हा करावी?

तीन वर्षांच्या वैवाहिक सुखानंतर, दिवस जाण्याची इच्छा असूनही कोणतंही नियोजनाचं साधन न वापरताही दिवस गेले नाहीत तर, तपासणी करून दिवस न जाण्याचं, मूल न होण्याचं कारण शोधायला हवं. अर्थात तीन वर्षाची ही मर्यादा ही लक्ष्मणरेषा नाही. कितीतरी जोडप्यांच्या बाबतीत ही कालमर्यादा बदलते. तसंच लग्नाच्यावेळी पतिपत्नींची वयं जास्त असतील तर, मात्र तीन वर्षांपर्यंतही न थांबता लगेचच तपासण्या करून घ्यायला हव्यात त्याच प्रमाणं वैवाहिक सुख, पुरुष किंवा स्त्रीमधील दोषांमुळं अनुभवाला येण कठीण जात असेल तर लगेचच तपासण्या करून घेणं चांगलं कारण यामुळे मूल न होण्याचा प्रश्न पुढं उद्‌भवणारच असतो.

गर्भधारणा कशी होते !

स्त्रीबीज व पुरुषबीज यांच्या संयोगातून गर्भधारणा होत असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. स्त्री पुरुषबीजाचा संयोग गर्भनलिकेमध्ये ( फॅलोपियन ट्यूब ) होतो आणि नंतर हा गर्भ गर्भाशयामध्ये येऊन वाढीला लागतो. पाळी जर नियमित असेल, तर सामान्यता पाळीच्या चौदाव्या दिवशी किंवा चौदाव्या दिवसांच्या आसपास स्त्रीबीज निर्माण होत असतं. म्हणून पतिपत्नी संबंध या सुमाराला आला तर गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच असते.

विवाहापूर्वी तपासणी

पुरुषत्वाचा किंवा स्त्रीत्वाचा अभाव असल्यामुळे लग्नानंतर येणारं वैफल्य टाळण्यासाठी, आपल्याला लक्षात येण्यासारखी विकृती आढळली तर, लग्नाआधी लगेच तपासणी करून घेतली तर त्यावर उपाययोजना करायला सुरुवात करता येते. पाळी येतच नसेल, अगदीच अनियमित असेल, स्तनांची वाढ योग्य तऱ्हेनं झालेली नसेल किंवा पुरुषांप्रमाणं स्त्रीच्या शरीरावर केसांची वाढ झालेली असेल तर याची कारण शोधून काढणं केव्हाही चांगलंच. तसंच पुरुषामध्ये दोन्ही अंडबीज अंडकोषात नसतील, स्तनांची वाढ होत असेल, दाढी मिशा योग्य प्रमाणात येत नसतील तरीही तपासणी आवश्यक ठरते. तसंच लैंगिक शिक्षण आधीपासून माहिती करून घेतले की, नंतर वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत.


Read Agrowon News ( Please Add Skeep ) .............. 


कोणकोणत्या तपासण्या आवश्यक ?

वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी स्त्रीबीज निर्माण होणाऱ्या काळात पतिपत्नीसंबंध येऊ द्यावा. या गोष्टी कटाक्षान पाळूनही दिवस राह्यले नाहीत, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करून घ्याव्यात. डॉक्टर प्रथम दोघांचीही संपूर्ण शारीरिक व रक्त, लघवीची म्हणजेच गुप्तरोगासाठी व मधुमेहासाठीच्या तपासणी करतात, नंतर होते ती पती आणि मग पत्नीची विशेष तपासणी.

पुरुष तपासणी

(१) पत्नीच्या कोणत्याही विशेष तपासण्यापूर्वी पतीची वीर्य तपासणी ही सोपी, विशेष त्रास न घेता व कोणत्याही धोक्याची शक्यता नसल्यामुळे जास्त सोयिस्कर असते.
वीर्यामध्ये जर दोष आढळलाच तर, निष्कारण पत्नीच्या शस्त्रक्रिया करून तपासण्या करण्यात काहीच फायदा नसतो. म्हणून तपासणी सुरुवातीलाच करतात.
(२) वीर्यात दोष आढळला तर अंडबीजाच्या तुकड्याची तपासणी ( टेस्टीक्यूलर बायास्पी ) केली जाते.
(३) त्यावेळी अंडचीजाकडून इंद्रियाकडे जाणाऱ्या नलिकांचीही तपासणी ( व्हासोग्रफी ) सुलभत्तेनं करता येते.
वीर्य तपासणीत जर काहीही दोष आढळला नाही तर मग पत्नीच्या तपासण्यास सुरुवात केली जाते.

स्त्री-तपासणी

(१) लॅप्रोस्कोप
ही तपासणी लॅप्रोस्कोप नावाच्या दुर्बिणीसारख्या यंत्राच्या सहाय्याने जाते. बेंबीपाशी सूक्ष्म क्षीद्र पाडून लॅप्रोस्कोपमधून पोटात बघता येतं. यामुळं गर्भाशयाची पिशवी, तिचा आकार, स्थिती ( पालथी सरळ ) तसंच फायब्राईडसारखे ट्यूमर असल्यास तीही वैगुण्य कळू शकतात. याचबरोबर गर्भनलिका, स्त्रीबीज निर्माण करणाऱ्या ग्रंथीही ( ओव्हरीज ) बघता येतात. यामुळं स्त्रीबीज वेळच्यावेळी निर्माण होतं का ? हेही कळतं. त्याचवेळी गर्भाशयाच्या तोंडातून रंगीत औषध घालून गर्भनळ्या उघड्या आहेत का ? तेही पाहाता येतं. बंद असतील तर त्या नेमक्या कुठं बंद झाल्या आहेत ? कशामुळे बंद झाल्या आहेत ? या गोष्टीही समजू शकतात. या तपासणीमुळे पोटातील टी. बी. ट्यूमर यासारखे रोग आहेत का ? हेही समजून घेता येते.
या नंतर गर्भाशयाचं तोंड मोठं करून ( डायलेशन) क्युरेटिंग करतात. गर्भाशयाच्या आतलं आवरण काढून ते पॅथॉलाजीकल तपासणीसाठी पाठवलं जातं. या तपासणीमुळं वेळच्यावेळी स्त्रीबीज निर्मिती होते की नाही-गर्भाशयाच्या पिशवीला टी. बी. सारखा जीवघेणा विकार आहे की नाही याचा शोध घेता येतो.
लॅप्रोस्कोपी केली तरी पेशंटला त्याच दिवशी घरी जाता येतं.
लॅप्रोस्कोपीचे फायदे
(१) एकाच ऑपरशेनमध्ये एकाच वेळी गर्भाशयाची संपूर्ण माहिती मिळू शकते.
(२) त्याचवेळी क्युरेटिंगचही ऑपरेशन होऊन जातं.
(३) गर्भनलिकांची तोंडं उघडी आहेत की नाही हे कळू शकतं.
(४) वेळच्या वेळी स्त्रीबीज निर्माण होतं की नाही हे कळतं .
(५) गर्भनलिका लाळेसारख्या प्रवाहामुळं ( म्यूकस ) बंद असेल, तर गर्भाशयाच्या तोंडातून भरलेल्या ओषधामुळं गर्भनलिका पुन्हा मोकळी होऊ शकते.
(२) इंडोस्कोपिक फोटोग्रॉफी
लॅप्रोस्कोपी करताना जे प्रत्यक्षात दिसतं ते या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं कायमचं टिपून ठेवता येत आणि एखाद्या एक्सरेप्रमाणं त्यात बघून असलेला दोष सांगता येतो.
क्युरेटिंगचे फायदे
(१) गर्भाशयाच्या पिशवीचं सर्वसामान्य ज्ञान होतं.
(२) आतील आवरणाच्या पॅथॉलॉजीकल तपासणीनंतर स्त्रीबीज तयार होतं किंवा नाही हे कळतं.
(३) गर्भाशयाच्या पिशवीला टी. बी. सारखा विकार असेल तर त्याचे निदान होतं.
(४) पिशवीचं लहान असलेलं तोंड मोठं होतं.
(५) फायब्राईड, पॉलिपसारख्या ट्यूमरचं निदान होतं.
एक लक्षात ठेवलं पाहिजे की, क्युर्टिंग केल्यावर दिवस जातातच असं नाही. तसंच पुनः पुन्हा क्युरेटिंग करून घेतल्याने दिवस जातात असंही नाही. उलट या वारंवार होणाऱ्या क्युरेटिंगमुळेच गर्भाशयाच्या नळ्या बंद होण्याची शक्यता असते त्यामुळे कायमचे वंध्यत्व येऊ शकतं.
(३) हवा भरणे :
पाळी संपल्यावार गर्भाशयामुखातून गर्भाशयात हवा भरली जाते. त्यामुळे गर्भनलिकांचा मार्ग उघडा आहे की नाही याचे ज्ञान होतं. त्याचबरोबर लाळेसारख्या घट्ट द्रवानं ( म्यूकस ) गर्भनलिका बंद झाल्या असतील तर त्या पुन्हा मोकळ्या करायला मदत होते.
(४) गर्भाशयाच्या फोटो
या फोटोमुळे गर्भाशयाची पिशवी, गर्भनलिका यासंबंधी माहिती मिळते. त्याचबरोबर फायब्राईड पॉलीपसारख्या ट्यूमर्सची माहिती मिळते.
(५) संभोगानंतरची तपासणी :
संभोगानंतर काही तासांनी पत्नीच्या योनीमार्गातील व गर्भाशय मुखातील द्रवांची तपासणी करतात त्या द्रवांमध्ये असलेल्या शुक्रजंतूचे प्रमाण यामुळे कळतं.
(६) आणखी काही तपासण्या
यामध्ये आंतस्त्राव ( हार्मोन्स ), इस्ट्रोजीन, प्रोजेस्ट्रॉन, एफ्‌. एस्‌. एच्‌. एल्‌. एच‌. यांच्या तपासण्यांचा अभ्यास समावेश होतो.
यामध्ये स्त्रियांमध्ये निर्माण होणारे आंतस्त्राव व त्यांचं कमीजास्त होणारं प्रमाण याचं अचूक निदान करता येतं. त्याचबरोबर स्त्रीत्त्व व स्त्रीबीज निर्मिती याविषयी ज्ञान मिळू शकतं. परंतु ही तपासणी खूपच खर्चाची असते आणि ती करण्याची सोयही पुण्या मुंबई सारख्या मोट्या शहरातच आहे.



Read Kundali ( Please Add Skeep ) ..............    


पती-पत्नीच्या तपासणीनंतर......

पती-पत्नीच्या तपासणीनंतर दोष कोणात आणि किती प्रमाणात आहे, याचा एकत्रपणे आणि साकल्यानं विचार करून त्यावर करावयाची उपाययोजना आखली जाते. दोष नेमका कुठं आहे तो नीट होईल का मूल होण्याची शक्यता किती असेल, हे डॉक्टरांकडून पती पत्नीनं समजावून घेतलं की मग पुढच्या उपाययोजना करणं सोयीचं जातं.

पुरुष-दोषावर उपाययोजना

(१) दोष निर्माण होऊ नयेत म्हणून उपाय : हार्निया, हायड्रोसिल, अंडगोळी अंडकोषात नसणं अशा विकारांवर वेळीच उपाय करण्यात आले म्हणजे पुढं येणारं वध्यंत्व टाळता येतं. अंडगोळी अंडकोषात नसणं यावर उपाय लहानपणीच मुलाला शाळेत घालण्यापूर्वीच करून घ्यावा. म्हणजे पुढं होणारे दुष्परिणाम टाळता येतातं. लहानपणी खेळताना, सायकलवर बसताना, कुस्ती खेळताना अंडबीजाला मार लागला असेल तर डॉक्टरांकडून उपचार करून घेणं आवश्यक असतं तसंच करकचून लंगोट बांधणं ही सवय वीर्यनिर्मितीला हानिकारक असल्यामुळे ती सवय बदलायला लावावी. वीर्य निर्मिती कमी प्रमाणात होत असेल तर लंगोट ना बांधता सकाळ संध्याकाळ दहा मिनिटं थंड पाण्यात बसावं. त्याचप्रमाणं लहानपणी होणाऱ्या गालफुगीम टॉफाईड, कावीळ यासारख्या रोगांमध्ये मुलाची नीट काळजी घ्यावी. मुलांवर योग्य संस्कार केले व सर्व गोष्टींची आरोग्य विषयक माहिती करून दिली तर अजाणतेपणी होणारे गुप्तरोग टाळता येतील.
(२) वीर्यनलिका बंद असल्यास उपाय : वीर्यनलिका कुठे, किती ठिकाणी व कशामुळे बंद झाली आहे याचा शोध घेऊन त्यावर उपचार करता येतात. बंद असलेला भाग काढून टाकून वीर्यनलिका परत जोडता येते. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व विशेष यंत्र व तंत्राच्या सहायाने ( मायकोसर्जरी ) केली गेली तर यशाचं प्रमाण खूपच वाढतं.



Read agriculture ( Please Add Skeep ) .................. 


स्त्रीदोष उपाययोजना :

(१) दोष निर्माण होऊ नयेत म्हणून काळजी
लहानपणी मुलींच्यावर चांगले संस्कार केले तर व सर्व गोष्टींची आरोग्यविषयक माहिती करून दिली तर अजाणतेपणी व भीतीपोटी होणारे गुप्तरोग टाळता येतील. आईनं मुलींना स्वच्छतेची व आरोग्याची आवड निर्माण करावी.
ऍबॉर्शन घडवून आणण्याची शस्त्रक्रिया शक्यतो टाळावी. तशीच वेळ आल्यास गर्भपात तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच व चांगल्या हॉस्पिटलमध्येच करवून घ्यावा.
(२) निश्चित उपाययोजना
(अ) हार्मोन्स : स्त्रीबीज जर वेळेवर निर्माण होत नसेल व पाळीही नियमित येत नसेल तर हार्मोन्सच्या गोळ्या देऊन हे घडवून आणता येतं. नवीन शोधामुळं स्त्रीबीज निर्माण होण्यासाठी हार्मोन्सची इंजेक्शन निघाली आहेत. सध्या त्याची किंमत जरी खूप असली तरी त्यांचा बऱ्याच अंशी फायदा होऊ शकतो.
(ब) पालथ्या पिशवीवर उपाय : केवळ पालथ्या पिशवीमुळे मूल न होण हे फारच थोड्या वेळा घडतं. बऱ्याच वेळा मूल होण्यासाठी पूर्णपणे तपासण्या न करता घाईघाईनं पालथी पिशवी सरळ करण्याचं ऑपरेशन केलं जातं आणि तेच बऱ्याच वेळा बंधत्वास कारण ठरतं.
(क) गर्भनलिका बंद असल्यास जोड ऑपरेशन : गर्भनलिका कुठे, किती ठिकाणी व कशामुळं बंद आहेत यावर उपाययोजना करणं जास्त श्रेयस्कर ठरतं. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व विशेष यंत्र तंत्राच्या सहाय्यानं ( मायक्रोसर्जरी ) केली तर यशाच प्रमाण खूपच वाढतं.
(ड) वारंवार गर्भपात होऊ नये म्हणून : याचं नेमकं कारण शोधून काढण्यासाठी बऱ्याच तपासण्या कराव्या लागतात. गर्भनलिका याच तोंड बंद असेल तर टाके घालून वारंवार होणारा गर्भपात टाळता येतो.
(इ) मानसिक उपाय योजना : वरील सर्व उपायांबरोबर स्त्रीला धीर देणं हे तितकंच महत्त्वाचे ठरतं. काही वेळेला नुसत्या डॉक्टरीच्या व्यक्तिमत्त्वामुळेच व समजावून देण्याच्या पद्धतीनंच तसंच उत्साहाच्या दोन शब्दानीच निम्म्याहून अधिक काम झालेलं असतं.
(फ) कृत्रीम गर्भधारणा : पुरुषाच्या वीर्यात जर दोष असेल व तो बरा न होण्यासारखा असेल तर दुसऱ्या अनाहूत डोनरचं वीर्य घेऊन कृत्रिम गर्भधारणा करता येते. अर्थात कृत्रीम गर्भधारणेच्या आधी पती पत्नी दोघानीही संमती द्यावी लागते. कृत्रीम गर्भधारणा ही पूर्णपणे गुप्तच ठेवली जात असल्यामुळं समाजाच्या दृष्टीनं पतीपत्नीचं जीवन कुठंही विस्कळीत होत नाही. पण यासाठी दोघांच्या मनाचा घट्टपणा व दोघंही समविचारी असायला हवेत

टेस्ट ट्यूब बेबी

गर्भनलिका पूर्णपणे खराब झाल्या असतील तर अशा वेळी गर्भनलिकेत गर्भधारणा करता कृत्रीम तऱ्हेने शरीराच्या गर्भधारणा करून तो गर्भ गर्भाशयाच्या पिशवीत वाढवता येतो ही पद्धती अगदी नवीनच उपलब्ध झाली आहे व जगातील फारच थोड्या हॉस्पिटलमध्ये याची सोय आहे.

काय गोष्टी करू नयेत ?

मूल होण्यासाठी साधू, बैरागी यांच्याकडून अघोरी उपचार करून घेऊ नयेत तसंच होणारं मूल हा मुलगा असावा म्हणून पुसंवेदन विधी काही ठिकाणी केला जातो. ही पूर्णपणे भोंदू समजूत आहे. पोटात वाढणारा गर्भ मुलगा की मुलगी हे, स्त्री पुरुष बीज एकत्र येत असतानाच ठरत असतं आणि आत्ताच्या शास्त्राप्रमाणं हे लिंग कोणीही आणि कोणत्याही उपायानं बदलू शकत नाही. गंडेदोरे, मंत्रताईत, साधू, संन्याशी यांच्या तथाकथित मंत्रसामर्थ्यामुळं मूल होत, ही समजूत अत्यंत चुकीची आहे. असल्या गोष्टींना कोणीही फसता कामा नये. निपुत्रिकेला पुत्रवती होण्यासाथी वर सांगितलेले वैद्यकीय उपचारच उपयोगी पडतील.
आणि एवढंही करून मूल होऊ शकलं नाही तर काय करायचं ? मुख्य म्हणजे निराश व्हायचं नाही. आजारी माणसावर आपण उपचार करता असतो. खूप काळजी घेतो. पण दुर्दैवानं त्यातूनही तो दगावला तर आपण काय करू शकणार ? दुःख मिळायलाच हवीत आणि पुढे जायला हवं. आपल्याला मूल होणार नाही अस जरी पक्क कळालं तरी निराश न होता, एका मुलाची आई होता येत नाही, तर आपल्या समाजातल्या अनेक अनाथ मुलांची आई तुम्ही होऊ शकालच की नाही ? स्त्री ही मातृहृदयी असते. प्रेम माया तिनं लावली तर अनाथांची आई होणं अवघड नाही.
देवकी होता आला नाही, तरी यशोदा होता येतंच ना ?

गर्भारपण

                                                गर्भारपण 




Pregnancy | सुदृढ आणि सुजाण बाळाची चाहूल

डॉ. रमण नाडकर्णी

M.D.,F.C.P.C.

स्त्री रोग तज्ज्ञ

प्रेसिडेंट, फेडरेशन ऑफ ऑबस्ट्रॅ. अँड गायनिक

सोसायटीज ऑफ इंडिया. दिल्ली

सुदृढ, सशक्त व हुशार मुले ही ज्याप्रमाणे आई वडिलांचा तसेच समाजाला आधार असतात, त्याचप्रमाणे देशाची खरी संपत्ती असतात अशी मुले ही घडवावी लागतात. त्यांची योग्य ती शारिरीकव मानसिक घडण घडविण्यासाठी आई-वडिलांच्या प्रेमाचे व आधाराचे छत्र अत्यंत जरुरी असते त्याचबरोबर प्राथमिक वैद्यकीय ज्ञानसुद्धा अत्यंत उपयोगी पडते. मुलाला जन्म देण्याच्या पद्धतीत स्त्री ही चार अवस्थेतून जाते.
पूर्वगर्भावस्था. गर्भावस्था. प्रसूती अवस्था. सुतिकावस्था

पूर्वगर्भावस्था

सुदृढ आणि सुजाण बाळाची चाहूल
लग्नानंतरचा परंतु गर्भावस्थेच्या आधीचा काळ म्हणजे पूर्वगर्भावस्था ही एक महत्त्वाची स्थिती आहे. ह्या स्थितीकडे स्त्रीची शारीरिक व मानसिक तयारी केली जाते. काही शारीरिक रोग ( हृदयरोग, मधुमेह, क्षय, रक्तक्षय ) तसेच मानसिक रोगांसाठी स्त्रीची तपासणी केली जाते. अशापैकी कुठलाही रोग आढळून आल्यास त्याचा शक्यतोवर इलाज केला जातो काही शारीरिक रोगात किंवा मानसिक रोगामध्ये जर रोग पराकाष्ठेला पोहचला असता तर अशा स्थितीत गर्भवतीला शारिरीक व मानसिक विकारांचा धोका असतो.


Read Joke ( Please Add Skeep ) .........................


गर्भावस्था

गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतचा काळ असतो, त्याला गर्भावस्था म्हणतात. सामान्यपणे गर्भावस्थेची मुदत ९ महिने व ७ दिवस एवढी असते. किंवा साधारण २८० दिवस एवढी असते. गर्भावस्था ही स्थिती डॉक्टर आणि गर्भारीण या दोघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची स्थिती आहे. प्रसुतीमध्ये उद्‌भवणाऱ्या बऱ्याच अडचणींचा आढावा गर्भावस्थेत घेता येतो व त्याचा योग्य तो इलाज करूनशक्य तो अडचणी टाळता येतात किंवा त्यासाठी योग्य ती पूर्व तयारी करता येते.

प्रसूतीपूर्व तपासणी

स्त्रीस जेव्हा प्रथम गर्भार होणाची जाणीव होते. त्यावेळेस लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे योग्य असते. कारण गर्भावस्थेमध्ये ठारावि काळाच्या अंतराने स्त्रिची तपासनी होते . तिच्या गर्भाची वादतसेच गर्भास्थेमध्ये आढळू येणारे रोग यांचा बारकाईने अभ्यास केला जातो. अर्भकाची वाढ, गर्भाशयाची चाढ, प्रसूती मार्गाचा तपास व रक्तगट, रक्तदाब, मधुमेह तसंच प्रसूती मार्गात असणारे अडथळे वगेरे गोष्टींचा अंदाज डॉक्टरांना येतो.

गर्भवतीच्या जबाबदाऱ्या :

आहार

गर्भावस्थेत आहाराचे महत्त्व अधिक आहे. काही तज्ञांनी गर्भवती स्त्री व मूल ह्यांच्या आहाराविषयी परस्परांशी संबंध पारखताना मुलाला आईचं बांडगुळ म्हणून संबोधले आहे ही कल्पना जरी बऱ्या आयांना अजिबात रुचणारी नसती तरीसुद्धा याचा अर्थ एवढाच आहे की, मूल हे आईवर सगळ्याच दृष्टीने निर्भरित असते व त्यामुळे आई व मूल ह्या दोघांच्या आरोग्यासाठी आवश्यक तो आहार घेण्यात जबाबदारी आईवर असते.
साधारणरित्या गर्भवस्थेत स्त्रीच्या आहाराची गरज वीस टक्क्यांनी वाढते. आहार हा एकावेळी थोड असावा, परंतु थोड्या थोड्या अंतराने घ्यावा. आहार हा पौष्टिक व पचण्यास हलका असावा. खूप तिखट, तळलेले पदार्थ, उघड्यावरील पदार्थ शक्यतोवर टाळावेत रोज साधारण १ लीटर दूध अवश्य प्यावे. त्यामुळे रोजचे आवश्यक तेवढे प्रोटीन्स आणि कॅल्शियम मिळण्यास मदत होते. जर दूध आवडत नसल्यास दूधाचा कोठलाही पदार्थ घेण्यास हरकत नाही. पण रोजचे कमीत कमी १ लीटर दूध किंवा दूधाचा कोणताही पदार्थ घेणे आवश्यक आहे.

जर गर्भवती स्त्री अंडी व मांसाहार घेत असेल तर चांगला शिजवलेला व कमी तिखट असा आहार उच्चप्रतीचे प्रोटीन्स देण्यास फार उपयुक्त होतो. ह्याबरोबरच ६० ते ६५ ग्रॅम चरबी ( Fats )आणि ३०० ते ३५० ग्रॅम पिष्टमयपदार्थ ( कार्बोहायड्रेटस ) हे आवश्यक आहेत. मुबलक प्रमाणांत फळांचा रस, हिरव्या पालेभाज्या घेतल्यास यातून व्हिटॅमिन व खनीजे मिळतात. मुबलक प्रमाणात प्रवाही पदार्थ, पाणी अत्यावश्यक असते. साधारण २ लीटर पाणी व थोडेसे मीठ हे दिवसभरात घेणे आवश्यक आहे. गर्भवती स्त्रीने उपास-तापास, डाएटींग वगैरे कधीही करू नये. कारण त्याचे अनिष्ठ परिणाम होतात ते नंतर आई व मुलाला भोगावे लागतात.

दातांची निगा

दातांची योग्य ती काळजी घेणे अगत्याचे असते. दिवसातूनच कमीत कमी दोनदा रात्री झोपताना व सकाळी दात घासावे. दातांना कीड लागली असल्यास लगेच त्यासाठी योग्य ते उपचार करावेत. हिरड्यांना रोज सकाळी व रात्री मालीश करणे व खाल्ल्यानंतर गुळण्या करण्याची सवय लावून घेणे हे उत्तम.

मलित्सर्ग

रोज मलोत्सर्ग ठराविक वेळी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुबलक प्रमाणात भाज्या, फळे आणि पाणी आवश्यक आहे. जर मलोत्सर्ग नियमीत होत नसेल किंवा मलबद्धाचा त्रास असेल तर त्यासाठी मुबलक पाणी, फळे, पालेभाज्या यांचा जेवणात उपयोग करावा. जर त्यांनीसुद्धा फरक वाटला नाही तर इसबगोल, ऍग्रोलचा उपयोग करावा. भरपूर खजूर खावा. अंजीराचे सरबत उत्तम. जुलाबाचे ओषध शक्यतो टाळावे. मलोत्सर्गासाठी भारतीय पद्धतीचे संडास अधिक बरे असे प्रस्तूत तज्ञांचे मत आहे.

व्यायाम

व्यायाम हा हलका असावा. साधारपणे चालण्याचा व्यायाम असावा. वजने उचलणे तसेच पळापळीचे व्यायाम टाळावेत. घरातील हलकी कामे ९ व्या महिन्याच्या शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही. गर्भार स्त्रीस प्रसववेदनाच्या वेळी ज्याप्रमाणे जोर करून मुलाला प्रसूतीमार्गाच्या बाहेर पडण्यास मदत करते त्या प्रकारच्या व्यायामची सवय गर्भवती स्त्रीस करणे ही प्रसूती लवकर होण्यास लाभदायी ठरते.

Read devotional ( Please Add Skeep ) ..................


वैयक्तिक आरोग्य

रोज आंघोळ करणे, हलके, सैल व स्वच्छ कपडे घालणे आवश्यक असते. बाह्य जननेन्द्रीय पाण्याने धूवून पुसून कोरडी ठेवावीत.

स्तनांची निगा

रोज सकाळी आंघोळीच्या वेळेस स्तन व स्तनाग्रे स्वच्छ धुवावीत. काही स्त्रियांचे स्तनाग्र आत दबलेले असतात अशा परिस्थितीमध्ये प्रसूतीनंतर मुलाला स्तनपान करणे कठीण जाते म्हणून रोज आंघोळीच्या वेळेस आत दबलेले स्तनाग्र असल्यास त्यांना मसाज करून बाहेर प्रक्षेपित करावी. अंगठा व तर्जनी यामध्ये धरून कमीत कमी ७-८ वेळा फिरवावी. जर स्तनाग्रावर जखमा, खाचा असल्यास त्यात मलम लावावे. ब्रेसीयर्स ह्या साधारणपणे कापडाच्या असाव्यात. तसेच फार घट्ट न बसणाऱ्या पण स्तनांना आधार देण्यास योग्य असाव्यात.

संभोग

पहिले ५ महिने संभोग टाळावा कारण या काळात संभोग केल्याने गर्भपाताची शक्यता वाढते. तसेच शेवटचे २ महिने संबंध टाळावा. कारण योनीमार्गातील जंतू गर्भाशयापर्यंत जाण्याचा धोका असतो. मधील काळात संबंध ठेवण्याचा झाल्यास दर १५ दिवसात एखाद्यावेळीच ठेवणे योग्य आहे.

गर्भावस्थेचे किरकोळ आजार

गर्भवती स्त्रीस ही जाणीव करून द्यावयास हवी की, गर्भावस्था ही आरोग्याची एक निशाणी आहे तो रोग नव्हे.

मळमळणे व ओकाऱ्या

साधारण पन्नास टक्के गर्भवती स्त्रियामध्ये मळमळणे व ओकाऱ्या आढळून येतात. अशा ओकाऱ्याचे कारण जास्त करून मानसिक असते.
ओकाऱ्या सर्व गर्भवती स्त्रियांना होतातच असे नाही, पण जर जास्त त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट. ओकाऱ्या चालू असेपर्यंत गर्भवती
स्त्रियांनी स्वयंपाक न केलेला बरा. गोडपदार्थ, आईस्क्रिम वगैरे जास्त खावे.


Read Love Stori ( Please Add Skeep ) ........................


छातीत जळजळणे

बऱ्याच गर्भार स्त्रियात छातीत जळजळणे आढळते. सर्वसाधारणपणे न जळजळण्यासाठी तिखट पदार्थ वर्ज्य करावेत. थंड दूध दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे. जळजळणे थांबले नाहीच तर ऍटांसीड घ्याव्यात.
मलबद्धाचा त्रास असेल तर त्यासाठी आधी नमूद केल्याप्रमाणे उपाय करावेत.

डोकेदुखी, चक्कर येणे

हे सर्वसाधारणपणे रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण कमी झाल्याने होते. याचा इलाज म्हणून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने काही ना काही गोड पदार्थ तोंडात टाकावा.

झोप न येणे

हा एक त्रासदायक अनुभव आहे. दुपारचे कमी झोपावे. रात्री झोपताना एक ग्लास दूध प्यावे. हलकी फुलकी पुस्तके वाचावी. कधी कधी नातेवाईक व पतीची सहानुभूतीच पुरेशी असते. जरूर पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे झोपेची औषधे घेण्यास हरकत नाही.  

पायात गोळे येणे

हासुद्धा त्रासदायक अनुभव आहे. पायात गोळा येणे सर्वसाधारणपणे रात्री जास्त होते. जास्त त्रास होत असल्यास कॅल्शियम व व्हिटॅमिन बी आणि बी ६ इंजेक्शन उपयोगी पडतात.


Read भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय... 


पाठ दुखणे

साधारणपणे हॉरमोन्समधल्या फरकामुळे बऱ्याच गर्भवती स्त्रियांची पाठ दुखते. विश्रांती, पाठीचा मसाज कमरपट्टा व औषधे यामुळे बराच फरक पडतो.
गर्भावस्थेदरम्यान गर्भाशय व प्रसूतीमार्गाचा रक्तपुरवठा वाढतो व त्यामुळे प्रसूतीमार्गातील स्त्रावामध्ये वाढ होते. हा स्त्राव जर साधारण असेल तर ह्यासाठी इलाजाची गरज नाही. पण जर स्त्राव खूप होत असेल तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट आहे.
वरील गोष्टींचा एकंदरीत विचार करता असे आढळून येईल, की नियमीत प्रसूतीपूर्व जतनामुळे गर्भवतीला स्वतःमध्ये आत्मविश्वास वाटू लागतो. असा आत्मविश्वास स्त्रीचे मन व आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. गर्भावस्थेत उद्भवणाऱ्या अडचणींची आधी चाहूल घेऊन त्याप्रमाणे इलाज केल्यास प्रसूतीसुद्धा चांगली व सुरळीत होऊ शकते. अशा प्रसूतीपूर्व जतनाची व्यवस्था साधारणपणे सर्वच मोठ्या हॉस्पिटलात असते. तिचा सदुपयोग करून घेणे हे आपल्याच हातात आहे व आपल्याला अत्यंत हिताचेही आहे.

सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य

                      सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य 




डॉ. श्रीनिवास रानडे

B.Sc., M.B.B.S., D.D.V., F.C.P.S., F.C.S. ( London )

इमर्टस प्रोफेसर, त्वचारोग तज्ज्ञ, बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटल, पुणे

फॅशनची व्याख्या बदलू शकते पण आरोग्याची व्याख्या मात्र बदलत नसते. बदलून चालतही नाही
श्रीमती पिंटो नावाच्या एक महिला एक दिवस माझ्याकडे आल्या. त्यांची तक्रार जरा वेगळीच आणि काहीशी गमतीशीर होती !
श्रीमती पिंटोच्या चेहऱ्यावर गेली दोन वर्षे पुटकुळ्या उठत होत्या पण पुटकुळ्यांची पद्धत अशी की त्या शनिवार-रविवारी अगदी फुलून येत आणि नंतर आपोआप हळूहळू मावळून जात ! गुरुवार शुक्रवारपर्यंत चेहरा स्वच्छ होऊन जाई. नंतर पुन्हा शनिवारी चेहरा भरून जाई.

पिंटो अगदी वैतागून गेल्या होत्या. त्यांनी दोन वर्षात अनेक उपचार करून पाह्यले. तपासण्या, क्रीम, घरगुती औषधे सगळं झालं पण शनिवार-रविवार पुटकुळ्या चेहऱ्यावर आपल्या हजर !
त्यांना तपासले खरं, पण मलाही काय करावं प्रथम समजेच ना ! त्यांनी ठरवून टाकलं होतं, आता हा शेवटचाच उपाय. यापुढे उपचार बंद. त्यांचा निर्णय कळल्यामुळं माझीही जबाबदारि वाढली होती. मी पहिल्या प्रथम माझा सुरुवातीचा उपचार केला आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियाबद्दल विचारलं.
त्यांचे पती मुंबईला एका बड्या आंतराष्ट्रीय कंपनीत एक्झिक्युटिव्ह होते. ते पुण्याला शनिवार-रविवारी यायचे. दोन दिवस कुटुंबात राहून सोमवारी परत मुंबईला जायचे.
मिस्टर पिंटो पुण्याला आले की त्यांना भेटायला घेऊन येण्याबद्दल मी मिसेस पिंटोना सांगितलं.
नंतरच्या शनिवारी पतिपत्नी दोघं कन्सल्टिंरुममध्ये आले.
ते आत येताच इंपोर्टेड सेंटचा मंद सुवास रुममध्ये पसरला. ती दोघं बसली. पिटोंच्या अंगावरचा वास मला अस्वस्थ करू लागला. वास आवडला नाही म्हणून नाही; तर हा सेंटच मिसेस पिंटोच्या पुटकुळ्यांना कारणीभूत असेल काय असा विचार मनात आला म्हणून !


Read Marathi News ( Please Add Skeep ) ............................. 

मिस्टर पिंटोंना या आफ्टर शेव्हलोशनची खूप आवड. ते शानिवार-रविवार पुण्याला आले की साहजिकच ते इथंही दाढी केल्यावर हे लोशन वापरीत असणार !
दोन दिवस पत्नीच्या सहवासात काढून ते सोमवारी जात. म्हणजे त्यानंतर शनिवारपर्यंत मिसेस पिंटो एकट्याच.
मिस्टर पिंटोंना मी सांगितलं की तुम्ही पुण्याला पुन्हा आलात की दोन दिवस हे आफ्टर शेव्ह लोशन वापरू नका.
त्यांनी तसं केलं. दोनच दिवसांनी मिसेस पिंटो आनंदी चेहेऱ्यानं आल्या आणि सांगू लागल्या, ‘ हा शनिवार-रविवार पुटकुळ्या आल्या नाहीत !
अशा तऱ्हेच्या कितीतरी केसेस सांगता येतील. लोशन, क्रीम यासारख्या सौंदर्यप्रसाधनांमुळे कितीतरी स्त्रीपुरुषांना त्रास भोगावा लागत असतो. पण ते जागरूक राहत नाहीत.
सध्याच्या दिवसांत सौंदर्यप्रसाधं आणि फॅशनच्या बाबतीत प्रत्येकानं विशेषतः महिलांनी त्यांची निवड करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. खरं म्हणजे प्रसाधनं ही सौंदर्यवृद्धीसाठी तयार केली असतात. पण जर कोणी त्यांचे दुष्पपरिणाम काय होतात हे जर लक्षात घेतलं नाही, तर सौंदर्याऐवजी त्या प्रसाधनांपासून त्रासच होईल.

नेहमी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधनं

खाली उल्लेख केलेली प्रसाधनं नेहमी वापरलं जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते.

(१) हेअर डाईज :

आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारी कितीतरी माणसं असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरलं जातं. बऱ्याच पेशंटच्या बाबतीत ते सैतानी उपद्र्व देणारं असते ! असे कलप वापरल्यानं चेहेरा सुजणं, लाल होणं, तसंच टाळू, चेहेरा आणि डोळ्यांची आग होणं अशा व्याधी सूरू होताट. दीर्घ काळापर्यंत हे कलप वापरल्यामुळ या व्याधी व्यक्तीला कायमच्या चिकटतात.
कलप वापरल्यानं त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही उदाहरणं आहेत. मेंदी हा नैसर्गिक कलप असून अत्यंत कमी धोकादायक आहे.

(२) शांपू :

अनेक सुगंधी शांपूच्या सतत वापरानं डोक्याच्या त्वचेला गंभीर स्वरूपाचे अपाय होऊ शकतात. तसंच शांपूमुळे केसांची चमकही नाहीशी होत जाते. आणि केस गळायला लागतात.

(३) साबण :

बहुतेक सर्व साबणांमध्ये कॉस्टिक सोडा वापरलेले असते. विशेषतः औषधी साबणांमध्ये जंतू प्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढं त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात.

(४) केसांचे सुगंधी तेल :

जर कुणाला सुगंधी द्रव्यांची ऍलर्जी असेल, तर त्यांनी सुगंधी तेल न वापरणंच इष्ट असतं. कित्येकांना अशी तेलं वापरल्यानं डोक जड होणं, दुखणं, अशी दुखणी सुरू होतात. आयुर्वेदिक साबण व सौम्य तेलं विशेषतः खोबरेल तेल वापरणं हितकारक असतं.

(५) कुंकू :

ज्या रंगाची साडी त्याच रंगाची कुंकवाची टिकली कपाळावर हवीच, अशी हल्लीची फॅशन आहे. निरनिरळ्या रंगाची कुमकुम हल्ली बाजारात मिळतात. त्यात अनिलाईन डाईन आणि मधमाशांचं मेण वापरलेले असते. अशा कुंकवांच्या वापरामुळे आगपेणं आणि कोडसुद्धा होऊ शकतं.


Read vigyan ( Please Add Skeep ) ...................................... 


(६) मस्कारा व आग शॅडोज :

या प्रसाधनांमध्ये विविध धातूंचा उपयोग केला जात असल्यामुळं त्वचेचा रंग कायमचा बदलू शकतो. डागही पडू शकतात.

(७) लिपस्टिक :

लिपस्टिकच्या वापरामुळं ओठ अत्यंत आकर्षक आणि आव्हानात्मक दिसतात. हे खरं असलं तरी काही जणींना यातील मेण आणि रंग अपायकारक ठरू शकतात.

(८) फेस पावडार क्रीम :

विविध प्रकारच्या फेस पावडरींमध्ये क्रीम्स आणि फाऊंडेशन्समध्ये असे काही पदार्थ वापरलेले असतात की त्यांची अनेकांना ऍलर्जी असते. त्यामुळं त्वचा लाल होते. आग करणारं पुरळ उमटतं तर कित्येकदा चेहऱ्यावर चट्टेही पडतात.

(९) जीवनसत्त्वांचा वापर :

आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त औषधांचा तात्पुरता वापर केला केला तर त्वचा ठीक राहतेही पण सततच्या वापरामुळं त्वचा कधीही दुरुस्त होऊ शकणार नाही इतकी खराब होऊ शकते.

(१०) ब्लिचिंग एजंटस :

आपल्या त्वचेच्या काळ्या, सावळ्या रंगावर नाराज होऊन बऱ्याच स्त्रिया ‘ब्लिचिंग’ करून गोरे बनण्याचा अट्टाहास करतात. पण या खाळ्या सावळ्या रंगातही सौंदर्य असतं, तेज असतं याची कल्पना स्त्रियांना नसते. या ब्लिचिंग एजंटसमध्ये अमोनियाकरण केलेला पारा वापरलेला असतो. त्याच्यामुळं त्वचेला अपायच होत असतो.

(११) नेल पॉलिश :

सर्वसामान्यपणे नेलपॉलिशमध्ये ‘ फॉर्मलडिहाईड लिकर " या द्र्वाचा वापर केलेला असतो. त्यामुळं ‘ पैरानोसिया ’ म्हणजे नखांचा विकार होऊ शकतो. आणि काहीजणींना तर नखापासून दूर असलेल्या ठिकाणी म्हणजे पापण्याजवळ इसब वगैरेसारखे विकार होऊ शकतात.
हे सर्व वाचल्यावर कुणी घाबरून गेल्यास नवल नाही. पण या बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येकीला प्रत्येक सौंदर्य प्रसाधनाची ऍलर्जी असलेच असं नाही. प्रत्येकीच्या त्वचेची संवेदनक्षमता वेगवेगळी असते. सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापूर्वीच नीट दक्षता घेतली गेली तर त्याचा त्रास होण्याचा संभव कमी होतो.

नेहमी वापरात असलेले ब्रँड एकदम बदलून दुसरे सुरू करू नयेत. जर नवीन प्रकार वापरायला सुरुवात केल्यावर त्वचेवर काही अनपेक्षित चमत्कारिक बदल दिसले तर लगेच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि तो प्रकार वापरणं बंद करावं.
किंमत जास्त असलेलं अगदी परदेशी प्रसाधनही एखादीला छळू शकतं. तेव्हा आणि अपाय यांचा काहीही संबंध नाही. कधी कधी अगदी साधं मलमसुद्धा त्रासदायक ठरू शकतं. तेव्हा निसर्ग आणि नैसर्गिक उपचार हेच खरं. पाण्यानं स्वच्छ धुतलेला चेहरा नेहमीच टवटवीत दिसत नाही का ? तेव्हा आपल्याचं सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रसाधनांचा उपयोग न केलेलाच बरा.


Read Samaj ( Please Add Skeep ) ........ 

Wednesday 13 March 2013

वयाबरोबर मानवी मेंदू लहान होतो!

                  वयाबरोबर मानवी मेंदू लहान होतो!   

लंडन, बुधवार, 27 जुलै 2011

brain
ND
नवीन संशोधनातून असा निष्कर्ष पुढे आला आहे की वाढत्या वयाबरोबर मानवी मेंदू लहान होत जातो.

जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की, केवळ माणसांनाच असा मेंदू असतो की जो वाढत्या वयाबरोबर हळूहळू लहान होत जातो, आणि हा गुणधर्म फक्त माणसांमध्येच आढळून येतो, चिम्पाझीमध्येही असे काही होत नाही.

मोठा आयुर्मान व मोठा मेंदू यांमुळे होणारा हा तोटा सहन करणे भाग आहे. कदाचित वयानुसार न्यूरॉन्सची घट होत असल्याने हे होत असावे, असे डॉ. चेट शेरवूड यांच्या नेतृत्त्वाखालील संशोधकांच्या गटाने म्हटले आहे.

'डेली मेल'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की या अभ्यासासाठी संशोधकांनी मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅन पद्धतीचा वापर केला. दहा ते ५१ वर्षांच्या ९९ चिम्पांझींच्या मेंदूचे एमआरआय स्कॅन काढण्यात आले. यातून पुढे आलेले तपशील २२ ते ८८ वर्षे वयातील ८७ माणसांच्या मेंदूंच्या एमआरआय स्कॅनशी ताडून बघण्यात आले, असे मानवी आयुष्यात सर्व मुख्य प्रकारच्या मेंदू रचनांमध्ये आकार कमी कमी होत गेल्याचे स्कॅनवरून निष्पन्न झाले.  

Read vigyan ( Please Add Skeep ) ............

मुलगी वयात येत आहे

                               मुलगी वयात येत आहे 



कळी उमलतानाचे बदल काय असतील ?

Mulagi Vayat yet aahe

डॉ. (सौ) पद्मा राव

M.D. DGO

मुलांच्या पेक्षा मुली वयात लवकर येत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. या काळात मुलीच्यात खूप बदल घडून येत असतो. पाळी येणे हा त्यांच्या शरीरात
Mulagi Vayat yet aahe
होणारा महत्त्वाचा बदल होय. पन्नास वर्षांपूर्वी पाळी सुरू होण्याचं वय साधारणतः १५ ते १६ वर्षांच्या दरम्यानं असायचं. आता १२ वर्षांची मुलगी असताना पाळी येते असं पाहाणीत आढळून आलं आहे. पाळीचं वय इथं आधी का यावं याचं कारण समजणं तसं अवघडच आहे. पन सर्वसाधारण असं म्हणता येईल, की मेंदूच्या वाढीमुळे हा फरक होणं शक्य आहे. सभोवतालचं वातावरण आणि सात्त्विक पोषक आहारामुळे मुलींची एकुन वाढ लौकर होते आणि त्यामुळे मेंदूचीही वाढ लौकर होते. त्यामुळे शरीरातही बदल लौकर होणे साहजिकच असतं. जर १५ ते १६ वर्षांपर्यंत पाळू सुरू झाली नाही, तर मुलीच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असतां

पहिली पाळी येण्यापूर्वी

पहिली पाळी येण्यापूर्वीचा जो काळ असतो त्या दिवसांत मुलींच्यात शारीरिक आणि मानसिक बदल घडून येत असतात त्याविषयी माहिती करून घेणं उद्बोधक ठरेल.


Read Marathi News ( Please Add Skeep ) ...............  




मनोव्यापारातील बदल

मुलीचं मुलासारखं बंधमुक्त वागणं कमी होत जातं आणि तिचं एका मुग्ध कलिकेत रूपांतर होऊ लागतं अल्लडपणा जातो. तिचं वागणं, बोलणं काहीसं लाजाळू होतं. आपण आता लहान राह्यलोअ नाही याची तिला पुसटशी जाणीव होऊ लागते. लहान मुलासारखं वागविलं गेलं, तर तिला राग येऊ लाग्तो. तिला आता अधिकाधिक स्वतंत्रपणे वागण्याची इच्छा होऊ लागते. कुटुंबातील मोठ्या व्यक्तिंची प्रत्येक गोष्ट मुकाट्यानं ऐकण्याचं आणि सांगितलेलं पाळण्याचं तिला नको वाटतं. एवढंच नाही, तर आपल्या घरातल्यांशी उगीचच गप्पाटप्पा करण्याचही ती टाळायला पाहाते. एकांतात राहणंच ती पसंत करू लागते. चित्रं बघत बसणं किंवा वाचीत बसणं तिला आवडू लागतं.

शारिरीक बदल

पहिला पाळीच्या सुमाराला शरीरात होणारा मुख्य बदल म्हणजे छातीची वाढ होणं आणि गुप्तेंद्रियावर लव येणं. स्तन मोठे होणं हा नैसर्गिक बदल असतो. त्याचप्रमाणे लव येणं हाही बदल नैसर्गिकच असल्यानं त्याबद्दल कोणतीही लाज मुलीनं बाळगता कामा नये. या काळात काही मुली खांदे उंचावून आणि कुबड काढून चालतात. वाढणारे स्तन लपविण्यासाठी त्या पोक काढतात. पन असं करण्यानं त्या त्यांच्या शरीराची ऐटच घालवून बसतात. काही मुली छातीचे फुगवटे लपविण्यासाठी घट्ट बॉडीज वापरतात. अर्थात त्यामुळे त्या ते लपवू शकत नाहीतच पण रक्ताभिसरण सुद्धा व्यवस्थित होत नाही. मुलींच्या स्तनाची वाढ होणे यात त्यांना लाज संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. उलट त्यांना आपल्या स्त्रीत्वाचा अभिमानच वाटायला हवा. कायमच अज्ञानी, अबोध मुलगी म्हणून राहाण्यापेक्षा प्रत्येक मुलीनं आपल्यात होणारे बदल आणि त्यांची कारणं जाणून घेण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे.

इतर आणखी बदल

पहिली पाळी येण्यापूवी काही आठवडे मुलीला पांढऱ्या रंगाचा स्त्राव जाऊ लागतो. तो पाहताच काहीजणी घाबरूण जातात. आपल्याला काहीतरी रोग झाला आहे. अशी त्यांना भिती वाटू लागते, पण हा पांढरा स्त्राव होणं अनैसर्गिक नसून या काळात तो होणारच असतो.
पाळी यावयाच्या आधी काही आठवडि ओटीपोटात दुखू लागतं, तेव्हाही काही मुली घाबरून जातात. हे दुखणं गर्भाशयाच्या आकुंचन होण्याच्या क्रियेमुळे असतं आणि ते कालक्रमानं थांबतं. काही मुलींच्या गळ्यातील थॉयराडा ग्रंथीची वाढ होते. त्यामुळं गळा फुगल्यासारखा होतो त्याला गोलाई येते. पन हे तात्कालिक असते. त्यात घाबरून जाण्यासारखे काहीही नसते हे लक्षात ठेवावे.
याच काळात होणारा आणि त्रासदायक वाटणारा एक प्रकार म्हणजे तारुण्यपिटिका पाळीपूर्वी चेहऱ्यावर या पुटकुळ्या येऊ लागतात आणि साहजिकच मुलींना याचा मनास्ताप होऊ लागतो. आपल्या दिसण्याबद्दल विशेष दक्षता या काळात मुलींना असल्यानं या पिटिका त्यांच्या सौंदर्यात बाधच आणतात. पण या पिटिका म्हणजे शरीरात होणाऱ्या बदलाचाच एक भाग असतो. एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. काही मुली या काळात लठ्ठ होऊ लागतात. अशा मुलींच्या आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. पण कटाक्षानं अगदी कमी खाणं किंवा उपास करणं अशी उपाययोजना या लठ्ठपणावर कोणी करू नये. या वयात मुलीला सकस पोषक आहाराची आवश्यकता असते. फक्त खूप आहाराच्याबाहेर खाणं टाळलं म्हणजे झालं.  


Read भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय...


वयात येणाऱ्या मुलीच्या आईची जबाबदारी

मुलगी वयात येत असल्यामुळं तिच्यात होणारे मानसिक बदल प्रामुख्यानं तिच्या आईनं समजून घेतले पाहिजेत आणि तिच्याशी समजून वागलं पाहिजे. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिच्यावर कोणत्याही परिस्थितीत रागवता कामा नये. तिच्या वागणुकीतील बदल आईनं स्वीकारायला हवेत. आता आपली मुलगी विकसित होत आहे. आणि ती स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठीच या बदलाला सामोरी जाते आहे. हे लक्षात घेऊन आईनं मुलीला आता आदराची बरोबरीची वागणूक द्यायला हवी.
प्रत्येक मुलीला, पाळी म्हणजे काय, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणे ही अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि पाळी येणे ही एक आनंदाचीच घटना आहे. हे तिला समजावूनं दिलं पाहिजे. काही आया आपल्या मुलीला पाळी आली ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. साहजिक मुलींलाही ही एक शरमेचीच गोष्ट वाटू लागते. पाळी येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. उलट पाळी न येणं हीच अनैसर्गिक गोष्ट आहे. ३ ते ५ दिवस रक्तस्त्राव होणं ही एक नैसर्गिक बाब असते. आणि त्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्त्राव होऊ लागला तर मात्र ते अयोग्य असतं. हे मुलींना सांगितलं पाहिजे. पाळीच्या दिवसात शरीराची स्वच्छता कशी ठेवावी हेही आईनं मुलीला शिकवायला हवं. काही मुलींच्या पोटात पाळी चालू असतांना खूपच दुखतं, काहींना फार दुखत नाही. हे दुःख तसं इतकं तीव्र नसतं. लाडावलेल्या मुली मात्र त्याचा बाऊ करतात. पहिली एक-दोन वर्षे पाळी नियमितपणे दर महिन्याला येईलच असं नसतं. दोन किंवा तीन महिन्यांनीसुद्धा पाळी येऊ शकते. यात अनैसर्गिक असं काही नसतं. पण ही वस्तुस्थिती आईनं मुलीला सांगायला हवी. कारण पाळी दर महिना आली नाही तर मुलगी घाबरून जाते. तिच्या मनात भलते विचार येऊ लागतात. पाळी येऊन गेल्यावरसुद्धा गर्भधारणा होऊ शकते. खरं म्हणजे पाळी कधीच आली नसतानाही गर्भधारणा होवू शकते. अर्थात अशी उदाहरणं फारच कमी असतात. 

माझ्याकडे, अकरा वर्षांची एक मुलगी आली. तिचं पोट वाढलेलं होतं. पण आईच्या म्हणण्याप्रमाणं तिला एकदाही पाळी आली नव्हती. तपासल्यावर ती गर्भार असल्याचं आढळून आलं. ते ऐकून आईला आश्चर्यच वाटलं. एकदाही पाळी न आल्यामुळं, मुलीचं पोट वाढलं आहे त्याचे कारण कदाचित ट्यूमर असू शकेल असं तिला वाटत होतं. त्या मुलीला एक गुटगुटीत मुलगा झाला. अर्थात अशी उदाहरणं अगदी दुर्मिळ असतात.



Read Samaj Storis ( Please Add Skeep ) .......


मुलींच्यात होणारे शारिरीक आणि मानसिक बदल जाणून घेऊन, तिच्या येऊ घातलेल्या पहिल्या पाळीच्या संदर्भात तिचं मन तयार करणं, पाळी म्हणजे काय याची माहिती करून देणं हे प्रत्येक मुलींच्या आईचं कर्तव्य आहे. पूर्वीच्या पिढीतील मुलीच्यावेळची सभोवतालची परिस्थिती वेगळी होती. एकच कुटुंबपद्धती होती. घरात खूप माणसं असायची. बायकांची एकमेकीत पाळी, लग्न, गर्भारपण, बाळंतपण या विषयांवरच्या गोष्टींची चर्चा चालू असायची, वयात येणाऱ्या मुली आपल्या बहिणींकडून ते सारं शिकत असतं. पण आता कुटुंबव्यवस्थाच बदलत गेली आहे. बहुसंख्य कुटुंब आता लहन असतात. एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येत चालली आहे. आता मुलांना आपले आई वडील एवढंच आपलं कुटुंब हे माहीत असते. आपल्या चुलत, मावस भावंडांबद्दल, काका, मामा, आत्या यांच्याबद्दल फारशी माहिती नसते अशा परिस्थितीत कुटुंबातील सगळ्या मुलांची जबाबदारी प्रामुख्यानं आईवरच येऊन पडते. साहजिकच शरीरातील बदल आणि पाळीबद्दलची भीती मुलींच्या मनातून काढून टाकण्यासाठी आईनंच संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणं आणि योग्य रीतीनं पार पाडणं आवश्यक असतं मुलींच्या त्या संक्रमणावस्थेच्या कालात आईनं तिच्याशी हळुवारपणे, मैत्रीच्या नात्यानं वागून, विश्वासात घेऊन मुलीचं मनोधैर्य वाढविण्यासाठी झटल पाहिजे. आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आणि सर्वार्थांन परिपूर्ण अशी उद्याची स्त्री, म्हणून मुलीचं व्यक्तिमत्त्व विकसित करायला पुढं सरसावलं पाहिजे.


यौवनप्रांतातलं पहिलं पाऊल !

                             यौवनप्रांतातलं पहिलं पाऊल ! 



शरीराच्या आधी मुलीच्या मनाची तयारी व्हायला हवी

youwanatala pahila paul

सौ शकुंतला गोगटे

शेती करण्याआधी शेतकरी जमीननीट नांगरून तिची सगळी मशागत करून ठेवतो. मुलगी वयात येण्यापूर्वी, स्त्री म्हणून तिचं जीवन निसर्गनियमाप्रमाणे सुरू होण्यापूर्वीच तिच्या मनाची त्यासाठी तयारी करणं, तिच्या मनाची एक मशागत करून ठेवणं हे मुख्यतः मुलीच्या आईचं, किवां आई नसल्यास मोठ्या बहिणीचं आणि शाळेतल्या तिच्या शिक्षिकेचंही काम असतं.
मुलाची पौगंडावस्था नि मुलीचं यौवन प्रांतातलं पहिलं पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात. मुलांना ‘फॅक्ट्स ऑफ द लाइफ ’ बद्दल सांगणारे पुष्कळजन असतात. भाऊ असतात, मित्र असतात असल्या विषयांवर ते अगदी खुल्लमखुल्ला बोलू शकतात पण मुलीची आई जर समजा फारच सोवळ्या विचाराची असेल, तिच्या घरच्या वातावरणात मोकळेपणाचा अभाव असेल, आईच्या धाकानं तिला मैत्रिणींच्यातही फारसं मिसळता येत नसेल नी शाळेतही सेक्स एज्युकेशन मिळलेलं नसेल, तर अशी मुलगी वयात येताना अतिश्य कावरीबावरी होते, हवालदील होते, भिऊन जाते.

शंभर वर्षांपूर्वीच्या काळी, म्हणजे जेव्हा मुलगी वयात येण्यापूर्वी तिचं लग्न होत असे, बालविवाहाची प्रथ जेव्हा रूढ होती त्या काळात पहिल्यांदा नहाण आलेल्या छोट्याशा सौभाग्यवतीचं खूप कोडकौतुक केलं जात असे, त्या काळातल्या ‘न्हाणुली’ ला मखरात बसवत असत. तिच्या सासर माहेरचे किंवा अन्य जवळचे नातलग तिच्यासाठी चार दिवस चांगली चांगली स्वादिष्ट पक्वानं घेऊन येत असत. चार दिवस ती ‘अस्पृश्य’ असली तरी या कोडकौतुकाच्या बरसातीनं ती सुखावत असे. मग पाचव्या दिवशी ती स्वच्छ झाल्यानंतर मुहूर्त वगैरे पाहून तिचा गर्भाधान विधी केला जात असे. त्याकाळी न्हाणुलीचं असं कौतुक होत असे कारण पहिल्यांदा नहाण आलं म्हणजे तिच्या पतीच्या शेजेसाठी सिद्ध होत असे. या पहिल्यांदा नहाण आलेल्य न्हाणुलीचं दृश्य २२ जून १८९७ या नुकत्याच येऊन गेलेल्या चित्रपटात ‘सीताबाई चाफेकळीला नहाण आलं’ या गाण्याच्या दृश्यात आपल्या पैकी पुष्कळांनी पाहिलं असेल.


Read agriculture ( Please Add Skeep ) ................. 


पण पुढं बालविवाहाची प्रथा बंद पडून मुलींची लग्नं उशिरा व्हायला लागली म्हणजे लग्नाच्या आधीच मुलगी वयात येऊ लागली. पण तेव्हापासून न्हाणुलीचं कौतुक पडून मुलगी वयात आलेली पाहिली की तिची आई मोठ्या काळजीत पडलेली दिसू लागे. मुलगी न्हातीधुती झाली आता एकदा वेळेवर तिचं लग्न झालं तर बरं, नाहीतर मग चुकून वाटणाऱ्या या काळजीतूनच ‘पहिली पाळी’ या घटनेकडे पाहायची स्त्रीची नजर बदलली.
माझ्या लहानपणी तर बहुतेक मुलींना पाळीबद्दल काहीच नीटशी माहिती नसे. विचित्र, अर्धवट कुतुहल मात्र खूप असे. दर महिन्याला घरातल्या पांघरूण वेगळं, कुणी त्यांना शिवयाचं नाही. त्यांची आंघोळीची मोरी पण वेगळीचं. असं दृश्य सर्रास प्रत्येक घरात दिसून असे. अशा बाईला किंवा मुलीला विटाळशी म्हटलं जाई. तो शब्दच इतका घाणेरडा होता की विटाळशी म्हणजे कुणीतरी घाणेरडी बाई असं वाटे. बायकांना आणि मोठ्या मुलींना दर महिन्याला नेमका कावळा कसा आणि का शिवतो याचं घरातल्या लहान मुलींना नेहमीच मोठं नवल वाटे. कधीतरी मोठ्या बहिणीचे रक्तानं भरलेले कपडेही नजरेला पडत. मनातून अतिशय भीती वाटे. पन कुणी नीट समजावून सांगेल तर शपथ. मग अचानक एखादे दिवशी शाळेत किंवा ‘घराबाहेर असताना परकरावर डाग पडला की बिचाऱ्या मुलीच्या फटफजितीला पारावार उरत नसे. तिल अगदी मेल्याहून मेल्यासारखे होत असे.

आपल्याला पाळी आली आहे म्हणजे काहीतरी वाईट घडलंय, आपल्या हातून काहीतरी चूक घडलीच अशा विचारानं मुलगी कानकोंडी होऊन जात असे. एकदम रक्त पाहून ती भिऊन जात असे. ‘विटाळ’ हा शब्द ऐकला की कोणती कोवळी मुलगी शहारणार नाही ?
आता अर्थातच समाज बदललाय, मुलींच्या वागण्यात खूप आत्मविश्वास आला आहे. घरातल्या वातावरणातसुद्धा प्रसन्न मोकळेपणा आला आहे. निरोध आणि लूप असले शब्द आता लहान मुलामुलींना ठाऊक असतात. सॅनिटरी टॉवेल्सच्या जाहिराती सिनेमागृहातून आणि टी. व्ही. वर सुद्धा दाखवल्या जातात. ह्या बाबतीतला इतका उघडेवाघडेपणा आणि सवंगपणा पण मनाला तितकासा सुचत नाह. हे चित्र अजून थोडं बदलायला हवं असं वाटतं. त्यासाठी काही विचार खाली मांडले आहेत.
बहुतेक शाळांतून आता शरीरशास्त्र हा विषय शिकवताना स्त्री शरीराची आणि शरीरधर्माची ओळख मुलींना करून दिली जाते. पण पुष्कळदा पाळी येऊन गेल्यावर हे शिक्षण शाळेत दिलं जातं. थोड्या मोठ्या आणि जबाबदार मुलींना हे शिक्षण देण्यापेक्षा मुलींच्या दहाव्या अकराव्या वर्षीच तिच्या शरीरधर्माची ओळख तिला करून दिली पाहिजे. सरळ आणि सोप्या पण शास्त्रीय भाषेत अशी सगली पूर्व कल्पना दिली गेली तर ती केव्हांही जास्त चांगली.

पण शाळेपेक्षाही मुलीचं मन तयार करण्याची मुख्य जबाबदारी मुलीच्या आईची आहे. “मेला बायकांचा जन्मच वाईट” म्हणूनच देवानं तिच्यामागं पाळीचा हा त्रास लावला आहे. पूर्वीचे लोक तर अशा बाईला चार दिवस अगदी अस्पर्श मानत. पण हल्ली मेला सगळाच अनाचार माजलाय असं आईच जर बोलू लागली तर मुलीलाही पाळी हे संकट वाटणारच. यापेक्षा आईनंच तिला चांगल्या शब्दात ऋतुमती होणं हे निसर्गाचं वरदान आहे असं सांगून मुलीला आपल्या पहिल्या पाळीचं स्वागत करायला शिकवलं पाहिजे.
कळीचं जसं पूर्ण विकसित फूल होतं तशीच रजोदर्शनानंतर मुलीची बाई होते. मुलगी वयात येते. निसर्गानं तिला अपत्यधारणेची जी महान देणगी दिली आहे ती स्वीकारायला ती लायक बनते. निसर्गक्रमानुसार जे घडतं ते अमंगल असेलच कसं ? म्हणून आईनंच मुलीला त्यातलं मांगल्य समजावून सांगायला हवं.




Read Children Stori ( Please Add Skeep ) ............................ 



महिन्यातल्या या चार दिवसांत कोणती काळजी घ्यायला हवी, स्वच्छता कशी राखायला हवी हेही पहिल्या पाळीच्या वेळी आईनंच मुलीला सांगायला हवं. एखाद्या आईला जर हे जमत नसेल तर तिनं निदान आपल्या मुलीला विश्वासातल्या एखाद्या लेडी डॉक्टरकडे तरी जरूर पाठवायला हवं. सॅनिटरी टॉवेल्स कसे वापरले, त्यांची विल्हेवाट कशी लावावी, पाळीच्या वेळी जर विशेष त्रास होत असेल तर लाजून ती लपवून ठेवण्यापेक्षा आपल्या डॉक्टरांपाशी मोकळेपणानं बोलून उपचार घेणं किती अगत्याचं आहे हे सगळ मुलीला आपोआप कसं समजणार ? यात लाजण्यासारखे काहीही नाही. म्हणजे लाजिरवानं काहीही नाही असं मुलीला वाटायला हवं. अशी खोटी लज्जा कधी कधी किती घातक ठरते हेही आईनंच मुलीला नीट समजवायला हवं.
वयात आल्यानंतर अनिर्बंध पुरुष सहवास घडल्यास त्याचे काही परिणाम होऊ शकतील याची पण मुलीला पूर्ण कल्पना दिली गेली पाहिजे.
यौवन प्रांतात पडे पहिले पाऊल गडे !
मोहरली जिवीची अंबराई ग !
जरा हळू जपून चल बाई ग ’ 


अशी सूचना पण आईनं मुलीला जरूर द्यायला हवी.
पहिली पाळी येण्याआधीच ही सगळी पूर्वतयारी मनाची ही मशागत व्हायला हवी.

आजीबाईचा बटवा

वैद्य (कु.) निर्मला ग. जोशी B.A.M. and S. (Pune)

माजी रीडर व प्रमुख, प्रसूती तंत्र विभाग, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणशी

माजी सुपरिंटेंडेंट, शेट ताराचंद रामनाथ हॉस्पिटल, पुणे

आयुर्वेदिक कन्सेप्ट्स इन गायनॉकॉलॉजी या पुस्तकाच्या लेखिका

 

आजीबाईचा बटवा | aajibaaicha batawa
‘गृहिनी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं.
पोषणम शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. वैद्यकीय प्रतिष्ठा यांच्या स्पर्धेतच बहुशः गुंतला आहे. तेव्हा गृहिणीनंच थोड्या धिटाईनं आजीबाईचा बटवा हातात घेतला पाहिजे.
बटवा आजीबाईचा असला तरी ती शोभेची वस्तू नाही. या बटव्यातील चिजांची नीट माहिती करून न घेता बटव्याचा योग्य उपयोग करता येणार नाही. म्हणूनच प्रत्येक गृहिणीनं वरचेवर आढळणाऱ्या रोगांसंबंधी तक्रारींसंबंधी थोडीशी माहिती मिळविली पाहिजे.

Read agriculture ( Please Add skeep ) ................


‘ताप येणे’ ही अवस्थान घ्याना ! बहुसंख्य गृहिणी ‘अंग गरम वाटतं, ताप पाहिला नाही’ असं सांगतात. खरं तर प्रत्येक घरात एक थर्मामीटर असणे आवश्यक आहे. कुणाचाही ताप, तो दर चार तासांनी मोजून तापाची नोंद करावी. केवळ तापाचा चढ उतार लक्षात घेऊन ताप टायफॉईडचा आहे, मलेरिआचा आहे किंवा अन्य कोणत्या प्रकारचा आहे हे डॉक्टरलोक बरेचदा ओळ्खू शकतात. ताप नॉर्मलला येतो, की नाही यालाही फार महत्त्व असतं. ताप कमी आला यापेक्षा तो ९७ डिग्री किंवा ९७.५ डिग्री फॅ. पर्यंत एकदा तरी आला की नाही हे महत्त्वाचं ठरतं तसम्च तापाबरोबर डोकेदुखी, अंगदुखी थंडी वाजून ताप येणं, डोळ्याची आग होणं इत्यादी अन्य तक्रारी नोंद करावी.
त्रिभुवन कीर्ती हे त्याच्या नावाप्रमाणेच तापावरील एक अत्यंत उपयोगी औषध म्हणून कीर्ती मिळवून आहे. लहान मुलांना त्रिभुवन कीर्तीची पूड देण्यापेक्षा मधात उगाळूनमात्रा द्यावी. इतरांना २ ते ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा पाण्यातून द्याव्या. विशेषतः सर्दी अंगदुखी किंवा फ्ल्यू ची लक्षणे असतील तर तुळशीच्या रसातून औषध द्यावं. चंद्रकला हेही तापावरील एक गुणकारी औषध. विशेषतः ताप १०३-१०४ फॅ. असा तीव्र असेल किंवा तापाबरोबर अंगाची लाही लाही होणं, डोळ्यांची आग होणं, चेहेरा लालबुंद होणं अशा तक्रारी असतील तर १ ते २ गोळ्या दिवसातून ४ वेळा द्याव्या.

गुळवेल सत्त्व या वनस्पतीचं पर्यायी नाव अमृता आहे. खूप दिवस येणाऱ्या तापामध्ये, बरेचदा नेमके कारणही कळत नाही. शरीरात उष्णता कडकी वाढली असं म्हटलं जातं. अशा वेळी गुळवेल सत्त्व खूप दिवस पोटात द्यावे. किंवा गुळवेलीचा काढा द्यावा. ‘संशमनी वटी’ नावाच्या गोळ्याही मिळतात.
याहीपेक्षा तापावरील घरगुती उपचार म्हणजे विडा ! कडुनिंब, तुअळस व बेल यांची प्रत्येकी ७, ७ पाने घालून विडा तयार करावा व तो रोग्यास चावून चावून खाण्यास सांगावा. चव कडू लागते पण म्हणून त्यात साखर घालू नये. याच काढाही करून देतात. महिनेन महिने नवनवीन अँटिबॉयॉटिक्स-कॉर्टिझोन्स तपासण्या या आधुनिक पद्धतीनं बेजार झालेल्यांना तर हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही. विशेषतः मलेरियावर तर नुसत्या, कडूनिंबाचा विडा ३ दिवस थंडी वाजून ताप आला असता खाण्यास द्यावा.
तापाचा प्रकार कोणताही असला तरी रोग्यास तांदुळाची पातळ पेज, तूप,मीठ, मेतकूट असा हलका आहार जरूर द्यावा. रोग्याला कडेकोट, बंदोबस्तात न ठेवता त्याला मोकळी हवा व स्वच्छ उजेड मिळेल याची काळजी घ्यावी.
या छोट्याशा लेखात प्रत्येक रोगाबद्दल अशी माहिती देणं शक्य नाही. पण गृहिणीनं हे समजूनं घेतले पाहिजेकी आपण जे वापरणार व ज्या तक्रारीसाठी वापरणार त्या दोन्ही गोष्टींची माहिती स्वतः करून घेतली पाहिजे. यादृष्टीनं गृहिणीनं पुढील पुस्तके संग्रही ठेवावीत.

(१) आयुर्वेदीय औषधी गुणधर्मशास्त्र. वैद्य. पं. गंगाधरशास्त्री गुणे.
(२) नित्योपयोगी निवडक औषधे . श्री. म. गो. मोडक.
(३) गृहवैद्य - लेखक डॉ. र. कृ. गर्दे.
सामान्यतः आढलणारी तक्रार, त्यावरील आयुर्वेदीय, बाराक्षार किंवा होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथी व अगदी घरगुती असे उपचार यंचा तक्ता दिला आहे. त्याचा उपयोग करतानाच घरात पुढील गोष्टीही ठेवणं आवश्यक आहे.

Read Shree Saptashrung Nivasini Devi Tru... ( Please Add Skeep ) ..... 


थर्मामीटर, शेकण्याची पिशवी, सहाण, लहान खलबत्ता, कात्री, कापूस, बँडेज, चिकटपट्टी व गृहिणीने आपल्याला ज्याची चांगली माहिती आहे अशी १५ ते २० औषधे.
हे सर्व सामान व पुस्तके या सर्वांचा खर्च सुरुवातील एकदम १५० ते २०० रु. असा जास्तीत जास्त केला, तरी डॉक्टरांची बिले दिवसेंदिवस कमी होत गेलेली आढळतील, एवढं निश्चित !

तक्रार :- ताप येणे

आयुर्वेदीय :-
त्रिभुवन कीर्ति चंद्रकला वात विध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस काली मूर अ‍ॅकोनाईट
अ‍ॅलोपॅथी :-
क्रोसिन गोळ्या किंवा कोसिन सायरप
घरगुती उपाय :-
कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.



तक्रार :- सर्दी

आयुर्वेदीय :-
त्रिभुवन कीर्ति, सूक्ष्म त्रिफला, भल्लातकासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस, नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-
बेनेड्रिल
घरगुती उपाय :-
आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून

Read All India Shri Swami Samarth Seva- ... 


तक्रार :- खोकला

आयुर्वेदीय :-
अनंद भैरव रस सितोपलादि चूर्ण, कायारि वटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कल्फेरिआ फॉय नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-
ग्लायकोडिन बेंझोसिन
घरगुती उपाय :-
लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटणा जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी

तक्रार :- जुलाब

आयुर्वेदीय :-
संजीवनई कुटजारिष्ट शंखोदर अतिविषादि चूर्ण
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
नेट्र्म फॉस नक्स व्होमिका
अ‍ॅलोपॅथी :-
सल्फागॉनडिन एन्ट्राव्हायोफॉर्म
घरगुती उपाय :-
सुंठ + जायफळाचे चाटण वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.
 

तक्रार :- आव (रक्त पडत नसेल तर)

आयुर्वेदीय :-
संजीवनी कुट जारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली मूर मॅग्नेशियम फॉय
अ‍ॅलोपॅथी :-
मेट्रोजिल
घरगुती उपाय :-
मिरा + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण




Read agriculture ( Please Add Skeep )............


तक्रार :- उलट्या

आयुर्वेदीय :-
प्रबाळ पंचामृत सूतशेखर
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
इपिकॅक्यूना नक्यहोमिका नेट्रम मूर काली मूर
अ‍ॅलोपॅथी :-
स्टेमेटिल
घरगुती उपाय :-
मोरावळा, आले-लिंबाचे चाटण, महाळुंगपाक
 

तक्रार :- तोंड येणे

आयुर्वेदीय :-
कामादुहा-दुधातून तोंडाला लावणे
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली मूर लावण्यासाठी नेट्रममूर पोटात
अ‍ॅलोपॅथी :-
ग्लिसरिन बोरॅक्स
घरगुती उपाय :-
जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.

तक्रार :- पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन

आयुर्वेदीय :-
प्रवाळ पंचामृत सूतशेखर शंकवटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
नेट्रम सल्फमॅगेनिशयम फॉस मिलिका
अ‍ॅलोपॅथी :-
झायमेट डॉयव्हाल स्पेंशिनडॉन-बॅर-ल्गन्‌
घरगुती उपाय :-
भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा +लिंबू


Read Children Stori ( Please Add skeep ) ..................


तक्रार :- जंत कृमि

आयुर्वेदीय :-
कृमिमुरगर रस विडंगारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- सीना
अ‍ॅलोपॅथी :- हेल्मासिड, अ‍ॅडल्फिन इबेन
घरगुती उपाय :- वावडिंगाचे चूर्ण मधातून कपिल्लाची गोळी गुळातून

तक्रार :- सांधे दुखी

आयुर्वेदीय :-
सिंहनाद गुग्गुळ वातविध्वंस आर कंपाऊंड
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कल्केरिआ फॉस, मॅग्नेशियम फॉस, काली सल्फ
अ‍ॅलोपॅथी :-
ब्रुफेन
घरगुती उपाय :-
सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक

तक्रार :- मूत्र विकार

आयुर्वेदीय :-
चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ पुनर्मवासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-
अल्फानाइन मिक्चर
घरगुती उपाय :-
धने जिऱ्याचे पाणी वाळ्याचे सरबत गोखरूचा काढा


Read vigyan ( Please Add Skeep ) ......... 


तक्रार :- रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे )

आयुर्वेदीय :-
कोहळ्याचे पाणी चंद्रकला बोलबद्ध रस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-
क जीवनसत्त्व, के जीवनसत्त्व
घरगुती उपाय :-
लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण

तक्रार :- मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता )

आयुर्वेदीय :-
ब्राह्मीप्राश, अश्वगंधरिष्ठ, सारस्वतारिष्ठ, उन्मादगज केसरी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-
काम्पोज
घरगुती उपाय :-
वेखंडाची पूड हातापायास चोळणे कांद्याची दह्यातील कोशिंबीर

तक्रार :- पित्त उठणे, अ‍ॅलर्जी

आयुर्वेदीय :-
सूतशेखर आल्याच्या रसातून चंद्रकला + आरोग्यवर्धिनी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
हिपार सल्फ
अ‍ॅलोपॅथी :-
इन्सिडाल एव्हिल
घरगुती उपाय :-
अमसुलाचे पाणी

Read Marathi News ( Please Add Skeep ) .............


तक्रार :- भाजणे, पोळणे

आयुर्वेदीय :-
शतधौत धूत
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कन्येरिस मलम
अ‍ॅलोपॅथी :-
बर्नाल
घरगुती उपाय :-
तूप लावणे

तक्रार :- मुरगळणे लचकणे

आयुर्वेदीय :-
लेप गोळी पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
अर्निका मलम पोटात अर्निका
अ‍ॅलोपॅथी :-
आयोडेक्स पोटात रिड्युसिन
घरगुती उपाय :-
रक्तचंदन, तुरटी, हळद यांचा लेप

तक्रार :- जखमा

आयुर्वेदीय :-
शोअधन तेल लावणे, पोटात सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कॅलेंडुला मलम, कल्केरिआ सक्फ पोटात
अ‍ॅलोपॅथी :-
बर्नाल, जोनसनच्या पट्ट्या, पोटात सल्फा गोळ्या
घरगुती उपाय :-
स्वच्छ खोबरेल तेल



Read Samaj Stori ( Please Add Skeep ) ..............  



तक्रार :- दातदुखी

आयुर्वेदीय :-
लवंगेचे तेल पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरमफॉस मॅग्नेशियम फॉस कल्केरिआ फ्लूर
अ‍ॅलोपॅथी :-
लांग तेलाचा बोळा, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :-
तुपाचा बोळा

तक्रार :- कानदुखी

आयुर्वेदीय :-
सब्जाचे किंवा तुळशीचे तेल कानात घालणे, पोटात यू त्रिफला वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली सल्फ नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-
वॅक्सोल्व कानात घालणे, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :-
लसणीचे तेल कानात घालणे

तक्रार :- कातडीचे सामान्य विकार ( त्वचा रोग )

आयुर्वेदीय :-
आरोग्यवर्धिनी, गंधक रसायन सारिवाद्यासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कल्केरिआ फॉस नेट्रम सल्फ
अ‍ॅलोपॅथी :- ...
घरगुती उपाय :-
हळदीचा लेप गोमूत्रातून पोटात हिरडा उगाळून तुळशीचा रस लावण्यासाठी